• Sat. Jun 13th, 2026
    Manoj Jarange Patil Hunger Strike: मनोज जरांगे यांचे उद्यापासून बेमुदत उपोषण; सरसकट कुणबी प्रमाणपत्राची मागणी

    Maratha Reservation Manoj Jarange Patil Hunger Strike: मराठा समाजाचे मन जिंकण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संधी आहे. त्यांनी आमच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात, असे मनोज जरांगे म्हणाले.

    मनोज जरांगे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. प्रतिनिधी, जालना: मराठा समाजाला सरसकट कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गातील आरक्षण मिळावे यासह विविध मागण्यांसाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील येत्या शनिवारपासून (३० मे) अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसणार आहेत. पत्रकार परिषदेत जरांगे यांनी ही माहिती दिली.

    ‘आता फक्त अंमलबजावणी पाहिजे. चर्चा करणार नाही. हैदराबाद, सातारा गॅझेट लागू करावे. १९९० आणि १९९४ मध्ये जसे ओबीसी आरक्षण दिले; तसेच मराठा समाजाला आरक्षण द्यावे. तीच नियमावली लागू करावी. १९६७पासून आतापर्यंत मराठा समाजाचे नुकसान होत आहे. आमचा अनुशेष कोण भरून काढणार. आमच्या पाच पिढ्यांचे नुकसान झाले आहे. कुणबी आणि मराठा एकच आहेत. असा सरकारचा आदेश काढा. आता आरपारची लढाई आहे,’ असे जरांगे या वेळी म्हणाले.

    Sanjay Shirsat | संजय राऊतांचा जीव ना ठाकरे ना पवारांमध्ये मग कुणामध्ये? शिरसाट स्पष्टच बोलले

    ‘आता फोनवरून चर्चा नाही. खूप वेळ दिला. जीआर काढला, तर ५८ लाख नोंदी सापडल्या. व्हॅलिडिटीसाठी अर्ज केले आहेत. बलिदान दिलेल्या कुटुंबांना नोकरी देण्याची आणि निधी देण्याची मागणी केली आहे. ओबीसींनी न मागता त्यांना मंत्रालय दिले; आता आम्ही मराठा-कुणबी मंत्रालय मागत आहोत, तर ते देत नाहीत,’ असेही जरांगे यांनी या वेळी सांगितले.

    ‘मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील व आमदार प्रसाद लाड येणार आहेत हे आपल्याला माहीत नाही. अजित पवार व एकनाथ शिंदे यांचे मंत्री गरिबांच्या समस्या जाणून घेण्यासाठी अंतरवाली सराटीला येतात; म्हणून त्यांना टार्गेट केले जाते.

    Maharashtra TimesEknath Shinde: मनोज जरांगेंनी पुन्हा उपोषणाचं हत्यार उपसलं, शिंदेंनी सरकारची भूमिका मांडली; मराठा आरक्षणावर काय म्हणाले?
    या वेळी आपण कठोर आणि कडक आमरण उपोषण होणार आहोत. उन्हात एका बाजेवर बसून, उघड्यावर उपोषण करणार आहोत. पायात चप्पल घालणार नाही. डोक्यावर मंडप नसेल. पाणी पिणार नाही. जीवाची लाही लाही झाली, तरी आपण उठणार नाही. मराठा समाजाने अंतरवाली सराटीत येऊ नये. –मनोज जरांगे-पाटील, मराठा आरक्षण आंदोलक

    Maharashtra TimesAdhik Maas 2026 : जावयाची हौस सासऱ्याने पुरवली! धोंडे जेवणाला दिली चक्क घोडी
    मुख्यमंत्री-जरांगेंनी चर्चेतून तोडगा काढावा- रामदास आठवले
    मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे यांनी घेतलेल्या आंदोलनाच्या पवित्र्यावर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जरांगे यांची बैठक झाल्यास नक्कीच यावर तोडगा निघेल’, असे सांगितले. त्यामुळे या दोघांची एकत्र बैठक व्हावी, असा सल्ला आठवले यांनी दिला.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा