• Wed. Jul 22nd, 2026

    Vidarbha Sahitya Sangh:साहित्य संघातील वातावरण मॉलसारखे; ज्येष्ठ कवी नारायण कुळकर्णी कवठेकर यांची खंत

    Vidarbha Sahitya Sangh:साहित्य संघातील वातावरण मॉलसारखे; ज्येष्ठ कवी नारायण कुळकर्णी कवठेकर यांची खंत

    Narayan Kulakrni Kavthekar:विदर्भ साहित्यात संघात पूर्वी सारखं वातावरण नाही.नाट्यप्रयोग ,संदर्भ ग्रंथ आणि मार्गदर्शक पूर्वी सातत्याने होत असत.परंतू आता तसे दिसत नाही.
    अशी खंत ज्येष्ठ कवी नारायण कुळकर्णी कवठेकर यांनी पुस्तक प्रकाशन समारंभात व्यक्त केली.

    मोहोळ ग्रंथ प्रकाशन सोहळा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म.टा. प्रतिनिधी,नागपूर : ‘विदर्भ साहित्य संघ हे पूर्वी साहित्यासह विविध कलांचे आश्रयस्थान होते. तेथे गेल्यावर जिवंतपणा जाणवत असे. आता, वि. सा. संघात गेलो की मॉलमध्ये गेल्यासारखे वाटते,’ अशी खंत ज्येष्ठ कवी नारायण कुळकर्णी कवठेकर यांनी व्यक्त केली.

    ज्येष्ठ संपादक आणि लेखक प्रवीण बर्दापूरकर यांच्या ‘मोहोळ’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृहात सोमवारी हा कार्यक्रम विदर्भ गौरव प्रतिष्ठान आणि राम गणेश गडकरी प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी राम गणेश गडकरी प्रतिष्ठानचे डॉ. अविनाश रोडे होते. व्यासपीठावर ज्येष्ठ कवी नारायण कुळकर्णी कवठेकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा. शरद पाटील, लेखक प्रवीण बर्दापूरकर, वर्णमुद्रा प्रकाशनचे मनोज पाठक, गडकरी प्रतिष्ठानचे हेमंत काळीकर, विदर्भ गौरव प्रतिष्ठानचे बाळ कुळकर्णी, नीलेश खांडेकर उपस्थित होते.

    Maharashtra TimesCrime News : छळाला कंटाळून महिलेनं स्वत:ला संपवलं, चिमुकले आईच्या शोधात, तीन लेकरं मायेच्या छत्रछायेला पारखी; उपस्थितांचे डोळे पाणावले

    इमारतीत तसे वातावरण दिसत नाही

    विदर्भ साहित्य संघात पूर्वी अनेक तरुण अभ्यासासाठी येत असत. त्यांच्यासाठी तेथे संदर्भ ग्रंथ आणि मार्गदर्शन दोन्ही उपलब्ध होते. नाटक वगैरे कलाप्रकारांमध्ये काम करणारी मंडळी तेथे दिसत. अनेक चांगले नाट्यप्रयोग होत असत. आता, त्या इमारतीत असे वातावरणच दिसत नाही. साहित्याच्या सत्त्वासाठी आता तेथे जागा उरलेली नाही. काही करू बघणाऱ्या तरुण मुलांनी आता कुठे जायचे,असाही सवाल कुळकर्णी यांनी उपस्थित केला.

    प्रवीण बर्दापूरकर ,अविनाश रोडे मनोज पाठक यांनी केलं मनोगत व्यक्त

    ‘बर्दापूरकर यांनी स्वाभिमानाशी कधीही तडजोड केली नाही आणि पत्रकारितेतील मूल्यांशी तडजोड केली नाही. त्यांनी अनेकांना लिहिते केले तसेच अनेकांच्या अडचणीत मदतही केली,’ असे शरद पाटील म्हणाले.

    प्रवीण बर्दापूरकर यांनी आपल्या मनोगतातून पुस्तक आणि पत्रकारितेतील त्यांच्या लेखनाविषयी माहिती दिली. अध्यक्षीय भाषणातून डॉ. अविनाश रोडे यांनी प्रवीण बर्दापूरकर यांचे संपादक आणि लेखक म्हणून आलेले विविध अनुभव सांगितले. मनोज पाठक यांनीही मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे संचालन शुभदा फडणवीस यांनी केले. बाळ कुळकर्णी यांनी आभार मानले.

    टीम मटा ऑनलाइन

    लेखकाबद्दलटीम मटा ऑनलाइनमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन हा गेल्या २६ वर्षांपासून महाराष्ट्रातील अग्रगण्य पोर्टल आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक, कला, क्रीडा, मनोरंजन, लाइफस्टाइल या विषयावर बातम्या देण्याचा आणि वाचकांना अपडेट ठेवण्याचे काम केले जाते. या टीममधील प्रत्येक पत्रकार हा वाचक हा केंद्र बिंदू मानून त्यांना बित्तमबातमी देण्याचा प्रयत्न करतो.… आणखी वाचा