Vidarbha Rain: अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका रब्बी आणि बागायती पिकांना बसला आहे. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत आपला शेतमाल विक्रीसाठी घेऊन आलेल्या शेतकरी आणि व्यापाऱ्यांची अचानक आलेल्या पावसामुळे मोठी तारांबळ उडाली.
Ambenali Ghat Accident: ‘त्यांची जागा मी भरून काढू शकत नाही’; आंबेनळी घाटातील मृतांच्या कुटुंबीयांना धीर देताना उदयनराजे गहिवरले
उघड्यावर असलेला हरभऱ्याचा माल मोठ्या प्रमाणावर भिजल्याने शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे. कोंडेश्वर मार्गावरील मुख्य विद्युत वाहिनीमध्ये बिघाड झाल्याने तब्बल दोन तास वीजपुरवठा खंडित झाला होता. सुरक्षेचा उपाय म्हणून महावितरणने अनेक भागांतील वीज बंद ठेवली होती. वादळामुळे शहरातील काही भागांत विजेचे खांब आणि मोठी झाडे उन्मळून पडली, तर अनेक ठिकाणी विजेच्या तारा सैल झाल्या. महावितरणकडून युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू असून यंत्रणा पूर्ववत करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
बुलढाणा जिल्ह्याच्या काही भागात सोमवारी सायंकाळी वादळी पावसाचा तडाखा बसला. देऊळगाव राजा तालुक्यात काही गावांमध्ये घरांवरील टीनपत्रे उडाली. काही झाडेही कोसळली. देऊळगाव राजा तालुक्यात गारपीट व वादळी पावसाने दाणादाण उडाली. शिवनी आरमाळ येथे झाडाखाली दबून सहा मेंढ्यांचा मृत्यू झाला. अंढेरा येथेही अनेकांच्या घरांवरील टीनपत्रे उडाली. झाडे उन्मळून पडली. वीजपुरवठा खंडित झाला होता.
Maharashtra Politics: ‘नॉट रिचेबल’ नगरसेवकांवरुन राजकारण तापले; भाजप नेत्यांचा संपर्कात नसल्याचा दावा, काँग्रेसची टीका सुरुच
वीज कोसळून दोन ठार, एक गंभीर
भंडारा आणि बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पावसासोबत वीज कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला. सिंदखेड राजा तालुक्यातील राहेरी बुद्रूक परिसरात वादळी पाऊस झाला. रात्री नऊच्या सुमारास शेतातून दुचाकीने घराकडे जात असताना वीज कोसळून लक्ष्मीकांत भगवानराव देशमुख (वय ५०) यांचा मृत्यू झाला. तर बालू रामलाल मगर (वय ४५) हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर जालना येथे उपचार सुरू आहेत. भंडारा तालुक्यातील सिल्ली येथे मंगळवारी सायंकाळी अचानक वीज कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू झाला. शिवा दुधराम बागडे (३७), असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. शिवा हे शेतात हार्वेस्टरने धानाची कापणी करीत होते.
