Ambernath Politics: शिवसेना, भाजपच्या स्थानिक नेत्यांनी विषय समित्या आणि इतर पदांबाबत दोन दिवस वाटाघाटी करत पाच वर्षांचे यशस्वी सत्तासूत्र निश्चित केले.
अंबरनाथ नगरपरिषद(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
म. टा. वृत्तसेवा, अंबरनाथ: अंबरनाथ नगरपालिकेतील सत्तेसाठी गेले पाच महिने शिवसेना, भाजपमध्ये सुरू असलेला सत्तासंघर्ष अखेर मावळला आहे. शिवसेनेकडून भाजपला दिलेल्या युतीच्या प्रस्तावानंतर, बुधवारी दोन्ही पक्षातील स्थानिक नेते आणि राज्य पातळीच्या नेत्यांमध्ये झालेल्या सकारात्मक वाटाघाटीच्या चर्चेनंतर शिवसेना-भाजप युतीला मुहूर्त मिळाला. त्यानुसार गुरुवारी दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत जुने मतभेद विसरून शहर विकासाला प्राधान्य देत युतीच्या माध्यमातून शहर विकासावर लक्ष केंद्रित केले जाणार असल्याचे सांगितले.
अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीत शिवसेना, भाजप एकमेकांविरोधात लढले होते. त्यानंतर सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांना फोडाफोडीच्या राजकारणात दोन्ही पक्षांमध्ये टोकाचे वाद न्यायालयात गेले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी शिवसेना, राष्ट्रवादीचा गट नुकताच वैध ठरवला. त्यामुळे २७ नगरसेवकांच्या संख्याबळानुसार भाजप अल्पमतात तर, राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांच्या पाठिंब्यामुळे शिवेसना ३२ नगरसेवकांसह बहुमतात आली. त्यामुळे न्यायालयीन सत्ता संघर्ष संपल्यानंतर शिवसेनेने मोठ्या भावाची भूमिका घेत आणि शहर विकासाचे ध्येय समोर ठेवत भाजपसमोर युतीचा प्रस्ताव ठेवला. या प्रस्तावाला भाजपनेही शहर विकासाला प्राधान्य देत सकारात्मक प्रतिसाद दिला.
Rupali Chakankar: ‘खरातसोबत कोणतेही आर्थिक व्यवहार नाही, गुवाहाटीला दर्शनाला कुटुंबिय स्वतंत्र गेलो होतो’, चाकणकरांचं स्पष्टीकरण बुधवारी रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत स्थानिक शिवसेना, भाजपच्या नेत्यांमध्ये झालेल्या सकारात्मक बैठकीत युतीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.
Ashok Kharat प्रकरणात मोठी कारवाई; उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे निलंबित, तब्बल 143 वेळा कॉल केल्याचं समोर अधिकाऱ्यांचाही सुटकेचा निश्वास पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या या सत्ता संघर्षात नगरपालिकेतील तीन सर्वसाधारण सभा तसेच प्रशासकीय कारभारावर मोठा परिणाम झाला होता. तसेच, पालिकेतील मुख्याधिकारी आणि विभागप्रमुखांना दोन्ही पक्षांच्या नेत्यांची मर्जी सांभाळतांना तारेवरची करसत करावी लागत होती. त्यामुळे पालिकेतील अधिकाऱ्यांनीही या युतीनंतर सुटकेचा निश्वास सोडला आहे.
लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर
किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.
शैक्षणिक पात्रता किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा