Simhastha Kumbhmela: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने राज्य शासन ₹33,000 कोटींची विकासकामे हाती घेणार आहे. यामुळे 3,00,000 कोटींची अर्थव्यवस्था उभी राहील असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
म.टा. प्रतिनिधी, नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त नाशिक जिल्ह्यात होणारी ३३ हजार कोटींची गुंतवणूक तात्पुरती नसून, तिचा पुढील पंधरा ते वीस वर्षे नाशिकला फायदा होणार आहे. या गुंतवणुकीतून येत्या दहा वर्षांत जिल्ह्यात तीन लाख कोटींची अर्थव्यवस्था तयार होईल, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
14 हजार कोटींचा हजार
नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरण, जिल्हा उद्योग केंद्र व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने आयोजित उद्योग-कुंभ संगम व जिल्हा गुंतवणूक शिखर परिषदेच्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते. हॉटेल ताज येथे बुधवारी (दि. ६) दिवसभर ही परिषद झाली. त्यात ३१४ उद्योगांनी १४ हजार १५ कोटींचे सामंजस्य करार केले. त्यातून सुमारे ३५ हजार ८५७ नवे रोजगार निर्माण होणार असल्याचा दावा आहे.Maharashtra Highway Projects: राज्यातील राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांना गती! पुणे-सातारा, नागपूर-अमरावती, शिरूर-अहिल्यानगर… कसा होणार विकास?
या वेळी काही उद्योजकांना प्रातिनिधिक स्वरूपात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करार सुपूर्द करण्यात आले. जांबुटके येथील प्रस्तावित आदिवासी क्लस्टरच्या जमिनीचे महसूल विभागाकडून औद्योगिक महामंडळाकडे हस्तांतरण करण्यात आले. उद्योगमंत्री उदय सामंत, कुंभमेळामंत्री गिरीश महाजन, शिक्षणमंत्री दादा भुसे, अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ, वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे, खासदार डॉ. शोभा बच्छाव, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, माणिकराव कोकाटे, हिरामण खोसकर, महापौर हिमगौरी आहेर-आडके आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ‘सिंहस्थाची विकासकामे पुढील पंधरा ते वीस वर्षे ‘मॅग्नेट’चे काम करील. दळणवळण, ड्रायपोर्ट, रिंग रोड या सुविधांमुळे दहा वर्षांत जिल्ह्याची अर्थव्यवस्था तीन लाख कोटींवर जाईल. मधल्या काळात नाशिकच्या विकासाचा वेग मंदावला होता. मात्र, आता नाशिक मुख्य धारेत आले आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरवर नेण्यासाठी विकासात भौगोलिक समतोल गरजेचा आहे. त्यासाठी राज्यभर गुंतवणूक परिषदा घेतल्या जात आहेत. गेल्या तीन वर्षांत या परिषदांतून नाशिकमध्ये ३१ हजार ९४५ कोटींची गुंतवणूक झाली असून, त्यातून ६६ हजार जणांना रोजगार उपलब्ध होतील.
Pune News: ‘शटल सेवे’मुळे हिंजवडी होणार कोंडीमुक्त! 500 पिकअप पॉइंट्स, 80 बस; लाखो कर्मचाऱ्यांना फायदा होणार
डिजिटल कुंभमेळा
गेल्या दोन वर्षांत जिल्ह्यात एकूण ५७ हजार कोटींची गुंतवणूक झाली असून, त्यात महिंद्रा अँड महिंद्रा, रिलायन्स, लार्सन अँड टुब्रो, जिंदाल, सिमेन्स या मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे. दावोस परिषदेत नाशिक जिल्ह्यासाठी बारा हजार कोटींची गुंतवणूक झाली. नाशिकचा विकास आता थांबणार नाही. नाशिकचा आगामी कुंभमेळा डिजिटल राहणार असून, त्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा सर्वाधिक वापर केला जाणार आहे.’ प्रारंभी उद्योग विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी परिषद आयोजनामागील भूमिका विशद केली. विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी प्रास्ताविक केले.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा