• Sun. Jun 14th, 2026
    डोकाडिया कुटुंबावर कोणत्या विषाचा वापर? शरीरात किती प्रमाण? पायधुनीतील प्रकरणात प्रश्नांचे मोहोळ

    Mumbai Watermelon Death Case : एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू होतो, तेव्हा अशा प्रकरणांमध्ये डॉक्टरांनी पोलिसांना केवळ रिपोर्टिंग न करता एकमेकांच्या सहकार्याने हा विषय हाताळण्याची गरज आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : पायधुनी येथील एकाच कुटुंबातील चार जणांच्या मृत्यूप्रकरणानंतर फॉरेन्सिक सायन्स प्रयोगशाळांमधील सुविधा तसेच चाचण्या अद्ययावत करण्याची गरज अधोरेखित होत आहे. डोकाडिया कुटुंबातील चौघांचा मृत्यू का झाला, यासंदर्भात फॉरेन्सिक व हिस्टोपॅथालॉजी विभागाने अद्याप अहवाल दिलेला नाही.

    डॉक्टर-पोलिसांनी सहकार्याने विषय हाताळावा

    एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू होतो किंवा एकाच कुटुंबातील एकाचा मृत्यू आणि इतर रुग्णांवर वैद्यकीय उपचार सुरू असतात, तेव्हा अशा प्रकरणांमध्ये डॉक्टरांनी पोलिसांना केवळ रिपोर्टिंग न करता एकमेकांच्या सहकार्याने हा विषय हाताळण्याची गरज आहे. विषप्रयोग झाल्यानंतर मृत्यू झाला; मात्र त्या विषाचे शरीरामध्ये प्रमाण किती होते, विषाचा प्रकार निर्धारित ४० प्रकारांपेक्षा वेगळा असेल, तर निष्कर्षाप्रत येण्यात आव्हाने कलिना येथे असलेल्या फॉरेन्सिक सायन्स प्रयोगशाळेपुढे आहेत. गॅसचा वापर, अन्नातून विषबाधा, कीटकनाशकांचा वापर किती प्रमाणात झाला, त्याचा प्रकार कोणता होता, याची निश्चिती करण्यात एफएसएल लॅबला आजही मर्यादा आहेत.

    अनुभवी डॉक्टरांची देखरेख गरजेची

    शवविच्छेदनाच्या वेळी घेतलेले रक्ताचे, अवयवांचे, मलमूत्राचे नमुने, विषबाधेमुळे संसर्ग झाला असल्यास त्यासाठी मायक्रोबायोलॉजी विभागाचे विश्लेषणही महत्त्वाचे असते. यातील तिघांचे शवविच्छेदन जेजे रुग्णालयामध्ये झाले असून मुलीचे शवविच्छेदन पोलिस सर्जन यांच्या देखरेखीखाली करण्यात आले आहे. या प्रकरणातील गांभीर्य लक्षात घेऊन हे प्रकरण या विषयातील अनुभवी डॉक्टरांच्या देखरेखीखाली होणे अत्यंत गरजेचे होते. ते तसे झाले का, हीही बाब तपासामध्ये स्पष्ट होईल.

    Ambadas Danve | राज्याचे गृहमंत्री राजकारणात व्यस्त असल्यानं गुन्हेगार मोकाट, दानवेंचा टोला

    तेव्हा कोणते उपचार दिले?

    कलिंगड खाल्ल्यानंतर त्रास सुरू झाल्यानंतर डोकाडिया कुटुंबीय ज्या डॉक्टरांकडे सर्वप्रथम गेले, तेथे त्यांना कोणते उपचार देण्यात आले, उपचारासाठी विलंब झाला असे कारण जेजे रुग्णालयामध्ये झालेल्या बैठकीमध्ये निष्पन्न झाले असेल, तर हा विलंब खासगी की सार्वजनिक वैद्यकीय सेवा देताना झाला, हा मुद्दाही लक्षात घ्यायला हवा.

    विषप्रयोग होऊन मृत्यू झाल्यास नेमक्या कोणत्या प्रकारच्या विषाचा वापर करण्यात आला होता, याचे निदान करण्याची सुविधा फॉरेन्सिक प्रयोगशाळेमध्ये असली तरीही त्यात अवघ्या ४० प्रकारच्या विषाचे वैद्यकीय रासायनिक विश्लेषण करण्यात येते. त्या व्यतिरिक्त असलेल्या विषाचे निदान करण्याची सुविधा महाराष्ट्रात उपलब्ध नाही.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा