खासदार सुप्रिया सुळे यांनी आज मोठी घोषणा केली आहे. यापुढे कोणतीही निवडणूक ही पवार विरुद्ध पवार अशी होऊ देणार नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. दिवंगत उमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आठवणींनादेखील त्यांनी उजाळा दिला.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठी घोषणा केली आहे. यापुढे पवार विरुद्ध पवार अशी निवडणूक होऊ देणार नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. महाराष्ट्रात 2024 मध्ये पार पडलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पवार कुटुंबातीलच दोन सदस्य एकमेकांच्या विरोधात लढले होते. लोकसभेची निवडणूक जास्त चुरशीची ठरली होती. पण आता यापुढे पवार विरुद्ध पवार निवडणूक होऊ देणार नसल्याचं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. यावेळी त्यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आठवणींनादेखील उजाळा दिला. अजित पवार यांच्याशिवाय गेले तीन महिने कसे गेले? याविषयी देखील त्यांनी भाष्य केलं.
“कुठल्याही कुटुंबाचा कर्ता पुरुष, व्यक्ती जेव्हा अचानकपणे जाते, ज्या भावना प्रत्येक घरात असतात, ते अर्थातच आमच्या घरात आहेत. एक फरक जाणवतो, आपण बाहेर जावून त्या भावना दाखवत नाहीत. आमच्या वडिलांची सर्वात मोठी खासियत आहे की, ते घरात आणि घराच्याबाहेर सारखंच वागतात. ते कधीही स्वत:च्या भावना फारशा कुणाला दाखवत नाहीत आणि ते खूप कमी बोलतात. त्यामुळे त्यांच्या मनात काय चाललं आहे हे फार कमी लोकांना जाणवत असतं. जबाबदाऱ्या प्रत्येक असतात. अनेक कुटुंब आहेत ज्यांच्यावर असे प्रसंग आलेले आहेत आणि ताकदीने उभे राहून लोकांनी आपापल्या जबाबदाऱ्या पाळलेल्या आहेत. त्यामुळे नवीन कौतुक असं नाही. हा अडचणीचा, संघर्षाचा काळ सगळ्यांसाठी आहे. आता हमारी बारी आहे”, असं सुप्रिया म्हणाल्या.
“विलीनीकरणाचा विषय हा अजित दादांच्या मनात होता. आता अजित दादा नाही राहिले तर विषय राहिला कुठे? आता या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. अजित दादा माझा मोठा भाऊ आणि माझा नेतादेखील होता. अजित दादांना नेता आणि मोठा भाऊ हा सन्मान कालही दिला आणि उद्याही देणार आहे. दादा गेल्यानंतर खूप गोष्टी बदलल्या आहेत. त्यामुळे दादासोबतचे ते गोड नातं संपलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक जणाने आपल्या संघटनेत काय करायचं हा प्रत्येकाला सशक्त लोकशाहीत अधिकार आहे. प्रत्येकाने आपापले काम करावं. एवढीच अपेक्षा आहे”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
सुप्रिया पवार विरुद्ध पवार निवडणुकीवर नेमकं काय म्हणाल्या?
“हे मी अधिकृतपणे तुम्हाला सांगू इच्छिते आणि हे रेकॉर्ड करुन ठेवा, मी कधीही पवार विरुद्ध पवार अशी निवडणूक होऊ देणार नाही. यावेळेसही मी होऊ देणार नव्हते. पण आता अजित दादा नाहीत, त्यामुळे काही गोष्टी सांगणं मला गरजेचं वाटत नाही. जे झालं ते झालं गंगेला मिळालं. इथून पुढे सुप्रिया सुळे कुठल्याही पवाराच्या विरोधात लढणार नाही. वेळ पडली तर दुसरा निर्णय घेईन. पण हे परत मी होऊ देणार नाही”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. ‘एबीपी माझा’च्या कार्यक्रमात त्यांनी याबाबतची घोषणा केली आहे.
विधान परिषदेत मविआत एकी कधी दिसेल?
“विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतसुद्धा हळूहळू एकी दिसेल. निवडणूक असते तेव्हा प्रत्येकाच्या मनात अनेक गोष्टी आणि अपेक्षा असतात. शेवटी राजकारण आहे. आम्ही काही NGO चालवत नाहीत. राजकारणात अपेक्षा असतात. महाविकास आघाडीत तीन पक्ष आहेत. आमच्याकडे दडपशाही, भीती वैगेर काही नाही. प्रत्येकाला मनमोकळेपणाने बोलण्याच अधिकार आहे. आमच्याकडे फोन वगैरे येत नाहीत. आमच्याकडे तीनही पक्षांचे नेते मनमोकळेपणाने बोलत असतात. त्यामुळे एखादे मतभेद असते तर सशक्त लोकशाहीमध्ये त्यात गैर काय?”, अशी भूमिका सुप्रिया सुळे यांनी मांडली.
महाविकास आघाडीत फूट पडली का?
“आघाडीत अशा गोष्टी होत राहतात. आता तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी आणि आम्ही इंडिया आघाडीत एकत्र आहोत. पण निवडणुकीत ते वेगळे लढले. दुसऱ्याच्या घरात कशाला बघायचं, आमचंच बघा. आम्ही काँग्रेससोबत एकत्र आहोत. पण केरळमध्ये आम्ही एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढली. हे फक्त इथेच होत नाही तर पुणे महापालिका निवडणुकीत अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमच्यासोबत भाजपच्या विरोधात लढला. त्यामुळे आघाडीत अशा गोष्टी होत राहतात”, असं मत सुप्रिया सुळे यांनी मांडलं.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा