धाराशिव जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे. तुळजापूर, कळंब तालुक्यासह इतर भागात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. या गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या आंबा फळबागेचं मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे. हातात तोंडाशी आलेला घास निसर्गानं हिसकावल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय.शासनाकडे शेतकऱ्यांनी मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे