• Sat. Jun 6th, 2026
    Pahalgam Terror Attack : ‘वादी खुशहाल हैं; बेखौफ होकर आए…’; पहलगाममधल्या स्थानिकांची पर्यटकांना आर्त साद, दहशतवादी हल्ल्याची वर्षपूर्ती

    Pahalgam Attack One Year Complete : सन 2024 मध्ये पर्यटकांच्या संख्खेने उच्चांक गाठला होता. सुमारे 2.35 कोटी पर्यटकांनी राज्यात भेट दिली होती. ‘वादी खुशहाल हैं, बेखौफ होकर आए’ अशी आर्त साद स्थानिकांनी पर्यटकांना घातली आहे.

    पहलगाम हल्ला वर्षपूर्ती(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    प्रसाद पवार, पुणे : ‘कश्मीर की वादियाँ खिल रहीं है… टूरिस्ट भी आ रहें हैं, लेकिन सब को बेखौफ होकर आना चाहिए, आखिर ये अपनाही देश हैं…’ असे म्हणणे आहे, काश्मीरमध्ये पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज राहणाऱ्या टूरिस्ट गाइड आणि सहल आयोजकांचे. काश्मीरमध्ये पर्यटक येत असले, तरी अद्याप अनेकांच्या मनात ‘पहलगाम दहशतवादी हल्ला’ या घटनेचे भय दिसते. आपल्याच देशात पर्यटक म्हणून नाही, तर हक्काने, अधिकाराने या, निसर्ग अन् पाहुणचाराचा आनंद घ्या, प्रसंगी आमच्या घरी राहा… असे आर्जवही काश्मिरी मंडळी करीत आहेत.

    ‘आजही त्या घटनेचा परिणाम जाणवतो’

    ‘पहलगाम दहशतवादी हल्ला’ या घटनेला एक वर्षं पूर्ण झाल्यानिमित्त पहलगाममधल्या युवकांशी संवाद साधताना, अद्यापही सर्व काही सुरळीत झाले नसल्याची जाणीव होते. पहलगामचा रहिवासी सबझार भट म्हणाला, ‘आजही त्या घटनेचा परिणाम जाणवतो. आम्हा स्थानिकांना या घटनेने काय यातना दिल्या, ते शब्दांत सांगणे कठीण आहे. विविध राज्यातल्या ज्या पर्यटकांशी आमचे कौटुंबिक सौहार्दपूर्ण नाते तयार झालेले, ज्यांना आग्रहाने आम्ही आमच्या घरीही नेतो, त्यांना कुठल्या तोंडाने पुन्हा या म्हणायचे, असे वाटते. ‘पहलगाम’ या गावी लोक येतात; पण मुक्कामी थांबत नसल्यामुळे इथल्या पर्यटनावर, बाजारपेठेवर त्याचा नकारात्मक परिणाम कायम आहे. मात्र, कडेकोट सुरक्षा असल्याने बिनधास्त यावे, असे आम्ही सांगू शकतो. आमच्या जीवापेक्षा पर्यटकांच्या सुरक्षेचे मोल अधिक आहे, याची जाणीव आहे. बैसरन हा पॉइंट बंद आहे. मात्र, इतर सगळे पर्याय खुले आहेत. बेताब व्हॅली, आरू व्हॅली, ममलेश्वर मंदिर, चंदनवाडी, लिद्दर नदी, शेषनाग लेक परिसर इथं तुम्ही जाऊ शकता. अमरनाथ यात्रेची तयारीही सुरू आहे.’

    Maharashtra TimesPune Bus Accident CCTV : PMPMLचा ब्रेक अचानक फेल, भरधाव बस लग्नपत्रिकेच्या दुकानात शिरली; पुण्यात भीषण अपघात

    काश्मीरमध्ये यायला काहीच हरकत नाही

    श्रीनगर येथे हाउसबोट आणि पर्यटन नियोजन करून देणारे तौसिफ कोटरू म्हणाले, ‘श्रीनगरसह, सोनमर्ग, गुलमर्गला पर्यटकांची सर्वाधिक पसंती आहे. पर्यटकांची संख्या हळूहळू वाढते आहे. पहलगामला लोक मुक्कामी न थांबता एका दिवसात धावती भेट देऊन परत येत आहेत. सोनमर्ग-गुलमर्गमध्ये सध्या सर्वाधिक गर्दीचं वातावरण आहे. सुरक्षाव्यवस्था कडेकोट असल्यामुळे पर्यटकांनी काश्मीरमध्ये यायला काहीच हरकत नाही.’

    ‘काश्मीरमध्ये वारसा सहलींनाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. देशभरातील युवा पर्यटकांना काश्मीरची ओढ आहे. पूर्वी सहकुटुंब सहलींचे प्रमाण अधिक होते. आता विद्यार्थ्यांचे ग्रुप, कॉलेजियन्स स्वतंत्रपणे काश्मीरला भेट देत आहेत,’ असे काश्मीरमध्ये वारसा सहल आयोजित करणाऱ्या श्रीनगर येथील नम्रता वाखलू यांनी सांगितले.

    Maharashtra TimesPahalgam Attack : पतीला धर्म विचारुन संपवलं, मनात येतं दहशतवाद्यांशी लढून त्यांना वाचवू शकले असते तर… प्रगती संतोष जगदाळेंची जखम अजूनही भळभळती

    गुरेझ, केरन, किशनगंगा…

    ‘काश्मीरला भेट देणाऱ्या पर्यटकांमध्ये सध्या भारत-पाक सीमेवरील गुरेझ, केरन आणि तिथवाल येथील शारदापीठ (किशनगंगा व्हॅली) या ठिकाणांनाही पसंती मिळतेय. पहलगाम हल्ल्यानंतरही तिथवालच्या शारदा पीठला वर्षभरात दहा हजार भाविकांनी भेट दिली. काश्मीरमधल्या पर्यटनावर परिणाम झालेला असला, तरी आता भाविक आणि पर्यटक पुन्हा परतत आहेत,’ अशी माहिती तिथवाल शारदापीठाचे रवींद्र पंडिता यांनी दिली.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा