• Sat. Jun 6th, 2026
    Pahalgam Terror Attack: ‘पहलगाम’ची जखम वर्षानंतरही भळभळती! क्रूर हल्ल्याला सामोरे गेलेल्यांची भावना

    Pahalgam Attack One Year Complete: रास्ता पेठेतील ‘गनबोटे फरसाण’चे कौस्तुभ गनबोटे यांचा या हल्ल्यात मृत्यू झाला. ‘ते गेले, हे अजूनही मन मान्य करायला तयार नाही,’ असे सांगताना संगीता गनबोटे यांचा कंठ दाटून येतो. कुटुंबाची धुरा मुलगा कुणालने सांभाळली आहे.

    पहलगाम हल्ला(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. प्रतिनिधी, पुणे: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज, बुधवारी वर्ष पूर्ण होत असताना, तेथील ह्रदयद्रावक थरार जीवावर बेतलेल्या कुटुंबीयांच्या मनातील वेदना आजही ओसरलेल्या नाहीत. ‘गेल्या वर्षभरात आम्ही दोघी एकही रात्र सलग आठ तास झोपू शकलो नाही. कानात किंकाळ्या आणि रडण्याचे आवाज गुंजतात. दहशतवादी आल्याची स्वप्ने रोज पडतात, अशा शब्दांत आसावरी आणि प्रगती जगदाळे यांनी भावना व्यक्त केल्या.

    जगदाळे आणि गनबोटे कुटुंबीयांच्या मनावरील जखमा अजूनही ओल्या आहेत. मात्र दु:खातून सावरून आव्हानांना धैर्याने सामोरे जाण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू ठेवला आहे. भय जागे असले, तरी धैर्याने ते सामोरे जात आहेत.दरम्यान, गेल्या महिनाभरापासून पुण्यातील पर्यटकांचे पुन्हा एकदा चौकशीचे फोन सुरू झाले असल्याची माहिती पर्यटन कंपन्यांनी दिली.

    Maharashtra TimesPahalgam Terror Attack : ‘वादी खुशहाल हैं; बेखौफ होकर आए…’; पहलगामधल्या स्थानिकांची पर्यटकांना आर्त साद, दहशतवादी हल्ल्याची वर्षपूर्ती
    आठवणींची साक्ष देणारे क्षण…
    कौस्तुभ गनबोटे नेहमीच मुलाला जबाबदारीची जाणीव करून देत असत. ‘मी अचानक गेलो तर’ असा प्रश्न ते हलक्या फुलक्या शब्दांत विचारायचे; पण त्या वाक्यामागे दडलेली जाणीव आज खरी ठरल्याचे कुटुंबीय सांगतात. अक्षय्य तृतीयेच्या दिवशीचा एक प्रसंग कुटुंबासाठी खास ठरला आहे. कौस्तुभ यांना आंब्यांची विशेष आवड होती. त्या दिवशी कुणाल आंबे आणण्यासाठी गेला. मात्र, वडिल आणायचे, त्यांना आवडायचे असे आंबे त्याला मिळाले नाहीत. घरी येऊन त्याने आईला विचारले, ‘बाबा माझी परीक्षा घेत आहेत का?’ हा साधा प्रसंग कुटुंबासाठी भावनिक आठवण बनून राहिला आहे.
    Maharashtra TimesPune News : बाबा माझी परीक्षा घेतायत का? आंबे खरेदीवरुन कौस्तुभ गनबोटेंच्या लेकाचा प्रश्न, आई निरुत्तर; वर्षभरानंतरही दुःखाची छाया
    बेखौफ होकर आए…
    पुणे : ‘आजही त्या घटनेचा परिणाम जाणवतो. आम्हा स्थानिकांना या घटनेने काय यातना दिल्या, ते शब्दांत सांगणे कठीण आहे,’ अशी भावना जम्मू-काश्मीरमधील स्थानिकांनी व्यक्त केली. पहलगाम या गावी लोक येतात; पण मुक्कामी थांबत नसल्यामुळे इथल्या पर्यटनावर, बाजारपेठेवर त्याचा नकारात्मक परिणाम कायम आहे. मात्र, कडेकोट सुरक्षा असल्याने बिनधास्त यावे, असे आम्ही सांगू शकतो, असे अरमान मीर आणि कंवर टिकू यांनी सांगितले

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा