Marathi News Live: ‘राष्ट्र प्रथम, त्यानंतर पक्ष आणि मग संघटना ही विचारधारा कार्यकर्त्यांनी अंगीकारली पाहिजे, आपल्या देशाच्या व राज्याच्या नेतृत्वाच्या विश्वासावर ही निवडणूक लढवली जात आहे. महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकद लावावी, मतभेद विसरून पुढील दहा दिवसांत प्रत्येक बूथवर आणि प्रत्येक घरापर्यंत पोहचा,’ असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी बारामतीत झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात केले. दरम्यान, कोकण आणि महामुंबई परिसरातील रोजचे तापमान चाळीशीच्या पार गेल्याने नागरिकांच्या अंगाची लाही लाही होते आहे.
दिवसभरातील ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज पाहा एकाच ठिकाणी
