भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त परळीत कवीसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. मराठी साहित्यातील दिग्गज कवींच्या उपस्थितीत हा सुरेल कार्यक्रम उत्साहात पार पडला. या काव्य संमेलनात महाराष्ट्रातील नामवंत साहित्यिकांनी अनेक काव्यरचना सादर केल्या. पण त्यापैकी एका कवितेने मात्र पंकजा मुंडेंच्या मनात घर केलं.