सोलापूरच्या माढा तालुक्यातील अंजनगावचा वाद राज्यभरात चर्चेत आला होता. छ. शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यावरून निर्माण झालेल्या संघर्षावर अखेर तोडगा निघालाय. प्रशासन आणि स्थानिक राजकारण्यांकडून या मुद्द्यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरु होते. राज्य स्तरावर या मुद्द्याची प्रचंड चर्चा झाली होती. अखेर शुक्रवारी रात्री पालकमंत्री जयकुमार गोरे , कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक , पोलिस अधीक्षक, तसेच मोहोळचे माजी आमदार राजन पाटील आणि मराठा समाज प्रतिनिधी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत यशस्वी तोडगा निघाल्याचे स्पष्ट करण्यात आले.