Toll Refund: पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर फेब्रुवारीत झालेल्या 32 तासांच्या वाहतूककोंडीत 5 कोटींची टोल वसूली झाली आहे. यापैकी केवळ हलक्या वाहनांना टोल परत करण्याबाबत प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला आहे.
पुणे-मुंबई यशवंतराव चव्हाण दृतगती महामार्गावरील अडोशी बोगद्याजवळ ३ फेब्रुवारी रोजी ज्वलनशील पदार्थाचा टँकर उलटल्याने महामार्गावर सुमारे ३२ तास वाहतूककोंडी झाली होती. या काळात महामार्गावर अडकलेल्या प्रवाशांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागले. खाणे-पिणे व इतर सुविधांचा अभाव असल्याने प्रवाशांचे हाल झाले. स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेत चहा, पाणी आणि अल्पोपहाराची व्यवस्था केली. या दरम्यान ३ फेब्रुवारी सायंकाळी ५ ते ५ फेब्रुवारी पहाटे २ वाजेपर्यंत टोलनाक्यांवर वाहनांकडून टोल वसूल करण्यात आला. वाहतूक कोंडीत अडकूनही टोल आकारल्याने प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यानंतर टोल परत करण्याची मागणी जोर धरली. या पार्श्वभूमीवर रस्ते विकास महामंडळाने टोलमाफीबाबत सकारात्मक विचार सुरू केला आहे.
Bike Taxi: आता रॅपिडो, ओला, उबरची बाईक सेवा बंद? ‘बाइक टॅक्सी’ कंपन्यांचे परवाने तात्पुरते रद्द; परिवहन मंत्री सरनाईक यांची घोषणा
टोलमाफीचा प्रस्ताव
महामंडळाने वाहतूककोंडीत अडकलेल्या वाहनांना टोल परत देण्याबाबत एक सविस्तर प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावात कार, प्रवासी बस आणि मिनी बस यांसारख्या वाहनांना टोल परत करण्याची शिफारस करण्यात आली आहे. हा प्रस्ताव आता वरिष्ठ कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.
Traffic E-Challan: वाहतूकदारांना दिलासा मिळणार? थकीत ई-चलान दंडापैकी 50 टक्के रक्कम माफ करण्याचा प्रस्ताव; राज्य सरकारकडे सादर
या टोलमाफीचा फायदा प्रामुख्याने द्रुतगती महामार्गावरील वाहनांना होणार आहे. या वाहनांसाठी तब्बल १ कोटी २५ लाख २२ हजार १४६ रुपयांचा टोल परत केला जाऊ शकतो. तसेच, जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील वाहनांसाठी २८ लाख ११ हजार २८३ रुपये परत मिळण्याची शक्यता आहे. मात्र, द्रुतगती महामार्गावरील शेडुंग आणि जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील खालापूर आणि तळेगावदरम्यान येणाऱ्या शिळ फाटा येथील टोलनाक्यांवर या निर्णयाचा विशेष परिणाम होणार नाही. त्यामुळे या टोलनाक्यांवरील वाहनांचा टोल परत देण्याचा विचार सध्या तरी करण्यात आलेला नाही.
