शासकीय निर्णयानुसार, राज्यातील एकूण ४४९ वसतिगृहांपैकी ४१६ वसतिगृहांच्या नावांमध्ये बदल करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यानुसार आता मुलांच्या वसतिगृहांना ‘ डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह ‘ तर मुलींच्या वसतिगृहांना ‘ सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृह’ ही नावे असणार आहेत.
केवळ विद्यमान वसतिगृहेच नव्हे, तर यापुढे सामाजिक न्याय विभागांतर्गत नव्याने सुरू होणाऱ्या सर्व मुला-मुलींच्या वसतिगृहांना देखील हीच नावे दिली जाणार आहेत.
Satara News : लगीनघर दु:खाने वेढलं, भावाच्या लग्नासाठी जवानाने सातारा गाठलं, पण सुट्टी शेवटची ठरली
‘मागासवर्गीय’ शब्द वगळण्यामागची भूमिका
सध्या अनेक वसतिगृहांच्या नावांमध्ये ‘मागासवर्गीय’ या शब्दाचा वापर केला जात होता. प्रशासनाच्या मते, हा शब्द समाजातील उपेक्षित आणि शोषित घटकांकडे निर्देश करतो, ज्यामुळे नकळतपणे विषमता अधोरेखित होते. अशा नामकरणामुळे संस्थेची ओळख एका विशिष्ट घटकापुरती मर्यादित राहते आणि विद्यार्थ्यांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोनही प्रभावित होतो. ही नकारात्मकता दूर करण्यासाठी आणि सर्वसमावेशकता जपण्यासाठी ‘मागासवर्गीय’ हा शब्द काढून त्याऐवजी महापुरुषांची प्रेरणादायी नावे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील वसतिगृहांची स्थिती आणि सुविधा
राज्यात सामाजिक न्याय विभागामार्फत एकूण ४४९ शासकीय वसतिगृहे चालवली जातात. यामध्ये २३१ मुलांची आणि २१८ मुलींची वसतिगृहे आहेत. यामधील एकूण प्रवेश क्षमता: ४६,६७३ विद्यार्थी एवढी आहे.
Chhagan Bhujbal : ‘अजितदादांचं विमान झाडावर आदळल्याचं आश्चर्य वाटलं’; तपासातील झाडाच्या थेअरीवर छगन भुजबळांना शंका
मुलांची क्षमता: २४,९५८.
मुलींची क्षमता: २१,७१५.
या वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांना केवळ निवास व्यवस्थाच नाही, तर मोफत नाश्ता, दोन वेळचे जेवण, निर्वाह भत्ता, शैक्षणिक साहित्य आणि गणवेश यांसारख्या सुविधा पुरविल्या जातात. याशिवाय आधुनिक सुविधा म्हणून टीव्ही, वॉटर कुलर, ॲक्वागार्ड आणि सुरक्षिततेसाठी फायर फायटिंग सिस्टमचीही सोय करण्यात आली आहे.
