• Sat. Mar 14th, 2026
    Rajya Sabha Election 2026 : मविआत उमेदवारीसाठी रस्सीखेच, अखेर शरद पवारांचं नाव ठरलं? जयंत पाटील यांनी सांगितली Inside Story

    राज्यसभेच्या एकमेव जागेसाठी उमेदवारी मिळावी यासाठी महाविकास आघाडीच्या तीनही घटकपक्षांमध्ये रस्सीखेच बघायला मिळत होती. पण अखेर आता मविआत सामंजस्याने याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : राज्यसभेच्या 37 जागांसाठी निवडणूक पार पडत आहे. येत्या 16 मार्चला या सर्व जागांसाठी मतदान पार पडणार आहे. तसेच या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची तारीख आता जवळ आली आहे. अर्ज दाखल करण्यासाठी केवळ दोन दिवस आता शिल्लक राहिलेले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असावा? यासाठी हालचालींना वेग आला आहे. या निवडणुकीत महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणूक पार पडत आहे. सर्वपक्षीय बलाबल पाहता 7 पैकी 6 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होऊ शकतात. तर महाविकास आघाडीच्या वाट्याला केवळ एका जागेवर यश मिळण्याची शक्यता आहे. या एक जागासाठी मविआत गेल्या काही दिवसांपासून रस्सीखेच सुरु आहे. अखेर या एका जागेच्या उमेदवारीसाठी आज अतिशय मोठ्या हालचाली घडल्या आहेत.

    राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीवेळी दोन्ही नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे शरद पवार यांना राज्यसभेची उमेदवारी द्यावी, अशी विनंती केली. यावेळी तीनही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. या चर्चेनंतर जयंत पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी नेमकी काय चर्चा झाली, आणि पुढची रणनीती काय असेल? याबाबत महत्त्वाची माहिती दिली.

    जयंत पाटील नेमकं काय म्हणाले?

    “राज्यसभेच्या निवडणुकीसाठी 5 मार्चला अर्ज भरायचे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्ष यांच्या वतीने महाविकास आघाडीच्या वतीने सर्वांनी मिळून एक उमेदवार करावा यासाठी आम्ही उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यांना आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने भेट घेतली. शरद पवारांनी राज्यसभेवर पुन्हा जावं, असा आमच्या पक्षातील कार्यकर्त्यांचा, लोकसभा आणि राज्यसभेच्या सदस्यांचा आग्रह आहे. त्यामुळे आम्ही उद्धव ठाकरे यांना विनंती केली आहे. शरद पवारांसाठी आपण तीनही पक्षांनी महाविकास आघाडी म्हणून मिळून एकच उमेदवार ठरवण्याबाबत विचार करावा”, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.

    “महाविकास आघाडीचा एकत्रितपणाने निर्णय करु, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे. आमची काँग्रेस पक्षासोबत चर्चा झालेली आहे. आमच्या पक्षातील नेत्यांची भूमिका आम्ही त्यांना कळवली आहे. त्याप्रमाणे आज किंवा उद्या योग्य निर्णय होईल. आमच्या चर्चा सुरु आहेत. आज किंवा उद्या निर्णय होईल”, अशी देखील माहिती जयंत पाटील यांनी दिली.

    यावेळी जयंत पाटील यांना शरद पवार हे राज्यसभा निवडणुकीसाठी तयार आहेत का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर त्यांनी “आम्ही शरद पवार यांना सगळ्यांनी मिळून आग्रह केला आहे की, त्यांनी पुन्हा राज्यसभेवर जावे. आमच्या तीनही पक्षांची चर्चा दोन दिवसांत पूर्ण होईल”, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा