• Fri. Mar 6th, 2026
    Maharashtra Weather : महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला, पुढील चार दिवस हुडहुडीचे; मराठवाडा, मुंबईसह संत्रानगरी नागपूरही गारेगार

    Maharashtra Weather Update : राज्यात थंडीचा कडाका वाढला असून अनेक शहरातील तापमानाचा पारा 10 अंशाखाली गेला आहे. पुढील चार दिवस थंडी कायम राहणारा असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला आहे. अनेक भागात किमान तापमानाचा पारा 10 अंश सेल्सिअसपेक्षा खाली गेला आहे. राज्यात थंडीची लाट नाही, मात्र तापमानात मोठी घसरण झाली आहे. मुंबई आणि किनारी भागात, कोकणासारख्या शहरांमध्ये रात्रीच्या वेळी थंड वारे आणि थंडी जाणवत आहे, मात्र दुपारनंतर तापमानात वाढ होत असल्याने उष्णता जाणवते आहे.

    परभणीमध्ये सर्वाधिक कमी तापमान 6.8 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं आहे. तर धुळ्यात 7 अंश सेल्सिअस, अहिल्यानगरमध्ये 7.5 आणि निफाडमध्ये 7.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं आहे. राज्यात सर्वाधिक थंडीचा कडाका उत्तर महाराष्ट्र असण्याची शक्यता असून तेथील किमान तापमानाचा पारा 7 ते 8 अंश सेल्सिअस दरम्यान राहील.
    Maharashtra TimesIndigo Flights : इंडिगोची 80 उड्डाणं रद्द, तर काही विमानांचे मार्ग वळवले; कंपनीची प्रवाशांना विशेष सूचनावली; कारणही सांगितलं
    हवामान खात्याने पुढील चार दिवस मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका कायम राहण्याचा इशारा दिला आहे. तसंच अनेक भागात दाट धुक्यामुळे दृश्यमानतेवर परिणाम झाला आहे. अशात नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

    डिसेंबर महिन्यामध्ये संत्रानगरी गारेगार!

    नागपूर शहर आणि विदर्भ गेल्या काही वर्षांतील सर्वांत थंड हिवाळ्याचा अनुभव घेत आहे. या वर्षी डिसेंबर महिन्यात 17 दिवस तापमान 10 अंशांच्या खाली राहिलं. तसंच मोसमातील सर्वांत थंड दिवसांची नोंदही याच महिन्यात करण्यात आली.
    Maharashtra TimesPune News : माझी बायको सारिका मला किडनी देईल… पुण्यातील रुग्णालयात ट्रान्सप्लांट, 15 लाखांमुळे मोठा ट्विस्ट
    नागपूरकर नागरिक नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज होत असताना मंगळवारी किमान तापमान 8.6 अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरलं. त्यामुळे नागपूर विदर्भातील सर्वात थंड ठिकाण ठरलं. यापूर्वी, भारतीय हवामान विभागाने डिसेंबर-जानेवारी महिन्यांत सरासरी तापमान सामान्यापेक्षा कमी राहील आणि शीतलहरींच्या दिवसांमध्येही वाढ होईल, असा अंदाज व्यक्त केला होता. तो अंदाज खरा ठरला आहे.या महिन्यात, 6 तारखेपासून किमान तापमानात सातत्याने घट सुरू झाली. त्यानंतर केवळ एकदाच ते 10अंशांच्या वर गेले. या सततच्या थंडीमुळे दिवसाचे तापमानही विलक्षण कमी राहिले.
    Maharashtra TimesLocal Train : आता लोकलप्रवास सुस्साट… वांद्रे ते अंधेरी, कल्याण-कर्जत, पनवेल-कळंबोली… नव्या 749 लोकल फेऱ्या, कशा-कुठे चालवल्या जाणार?
    दीर्घकाळ टिकलेल्या थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी लाकूड आणि टाकाऊ साहित्य जाळले. त्यामुळे हवेच्या गुणवत्तेत बिघाड झाला आणि इतर वेळी ‘मध्यम’ दर्जात असलेली हवेची गुणवत्ता दिवस ‘खराब’ श्रेणीत गेली.

    ना चप्पल, ना शाळेची फी, कांद्यासोबत चिमुकलीचे स्वप्नही गेले; अवकाळीमुळे बीडमध्ये नुकसान

    प्रचलित जेट प्रवाह पॅटर्न आणि कोरडी वातावरणीय परिस्थिती तापमान कमी ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत होती, असे हवामानतज्ज्ञांचे म्हण्णे आहे. जानेवारी महिन्यातील काही दिवसही थंडी कायम राहण्याचा अंदाज आहे. थंडीचा कडाका वाढला असला तरी ‘हील स्टेशन’चा फील देणाऱ्या या थंडीचे नागरिकांनी स्वागत केले. त्यामुळे हा हिवाळा संस्मरणीय ठरला आहे.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केकरिश्मा भुर्के, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सिनीअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. मागील ३ वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्समध्ये कार्यरत. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, त्यानंतर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.… आणखी वाचा