Buldhana Murder Case: दुहेरी हत्याकांडाच्या या घटनेमुळे मेहकर शहरात भीतीचे वातावरण पसरलं असून, नागरिकांनी आरोपीला कडक शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मेहकर शहरातील शिक्षक कॉलनीमध्ये राहणारे माजी सैनिक हरी मस्के यांच्या घरी ही भीषण घटना घडली. हरी मस्के यांचा मोठा मुलगा राहुल उर्फ जितू हा सुशिक्षित असूनही बेरोजगार होता. काही वर्षांपूर्वी तो स्टेट बँकेत कॅश आण-नेण्यासाठी चार चाकी गाडी भाड्याने चालवत असे. मात्र, ती गाडी विकल्यानंतर राहुल पूर्णपणे बेरोजगार झाला आणि घरातच राहू लागला. याच काळात त्याच्या डोक्यात पत्नी रूपालीच्या चारित्र्यावर संशयाचे भूत शिरले. या संशयातून आणि बेकारीच्या नैराश्यातून त्याने पत्नीवर कुऱ्हाडीने वार करून तिची हत्या केली.
मुलाचा कसा झाला मृत्यू?
आईवर झालेल्या हल्ल्यानंतर तिचा आरडाओरडा ऐकून धावत आलेला चार वर्षांचा मुलगा रियांश यालाही कुऱ्हाडीचा घाव बसला आणि तोही या हत्याकांडात बळी ठरला. शेजाऱ्यांनी रूपाली आणि रियांश यांना उपचारासाठी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आरोपी राहुल निर्विकारपणे हे सर्व पाहत होता. त्याची आई तारामती माझ्या नातवाला का मारलं, असं म्हणत आक्रोश करत होती, पण राहुलवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. मृतक रूपालीचे वडील भास्कर शंकर वानखेडे यांनी मेहकर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, पोलिसांनी आरोपी राहुल मस्के याला ताब्यात घेतलं आहे.
दरम्यान, या हत्याकांडात चिमुकला रियांश वाचू शकला असता, जर तो त्या क्षणी आईजवळ गेला नसता. जेव्हा राहुलने पत्नीवर वार केले, तेव्हा आईचा आवाज ऐकून तो तिच्याजवळ गेला आणि दुर्दैवाने त्यालाही कुऱ्हाडीचा घाव बसला. जर तो क्षण टळला असता, तर कदाचित तो या भीषण हत्याकांडातून वाचला असत
