• Sun. Mar 8th, 2026
    Maharashtra weather : राज्यभरात थंडीचा कडाका वाढला, 7 जिल्ह्यांमध्ये Cold Wave चा इशारा; मुंबईत परिस्थिती काय?

    Maharashtra Weather Today : मुंबईसह राज्यभरातही थंडीचा कडाका वाढला आहे. 7 जिल्ह्यांमध्ये थंडीच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. अनेक शहरातील तापमान 10 अंशांपर्यंत आलं आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : मुंबईसह राज्यभरातही थंडीचा कडाका वाढला आहे. हवामान विभागाने सात जिल्ह्यांमध्ये थंडीच्या लाटेचा इशारा दिला असून इतरही राज्यातही तापमानाचा पारा खाली उतरणार असल्याची माहिती दिली आहे. राज्यातील अनेक शहरात तापमानाचा आकडा 10 अंशांवर पोहोचला आहे. उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यभरात थंडीचा कडाका वाढला असून हवामान खात्याने यलो अलर्ट दिला आहे.

    हवामान खात्याने मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट पसरणार असल्याचा इशारा दिला आहे. धुळे, नाशिक, नंदुरबार, अहिल्यानगर, पुण्यात तसंच सोलापूर आणि जळगावात तापमानाचा पारा खाली उतरुन थंडीच्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. राज्यभरात किमान तापमानाचा पारा 15 अंशांखाली गेला आहे.
    Maharashtra TimesMumbai Weather Update : मुंबई गारठली, पारा 15 अंशांखाली; यंदाच्या मोसमातील किमान तापमानाची नीचांकी नोंद
    मुंबईतही शुक्रवारी पहाटेपासून थंडी वाढली आहे. शनिवारीही मुंबईचं किमान तापमान 15 अंशांच्या आसपास होतं. रविवारी तापमानात काहीशी वाढ होण्याची शक्यता आहे. किमान तापमान 18 अंशापर्यंत असेल असा अंदाज आहे. मात्र 31 डिसेंबरपर्यंत हवामान थंड राहील, तापमानाचा पारा कमीच राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
    Maharashtra Timesमुंबई महापालिकेच्या सोडतीतील 373 सदनिकांचे विजेते जाहीर, पण 53 घरं प्रतिसादाविनाघरांच्या किमती 66 लाख ते एक कोटी

    जळगावातील दोघांचा थंडीने मृत्यू

    जळगाव जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून शीतलहर कायम आहे. किमान तापमान ७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने जिल्हावासीयांना हुडहुडी भरली आहे. दरम्यान, जळगाव तालुक्यात शुक्रवारी सकाळी रात्रपाळी करून आलेल्या कामगाराचा, तर दुसऱ्या घटनेत नशिराबाद येथे मंदिराच्या ओट्यावर वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या दोघांचा कडाक्याचा थंडीमुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकीय सूत्रांनी वर्तवला आहे.

    भाजपनं फिल्डींग लावली, पण मुंबई मनपा निवडणुकीत ठाकरेंना हरवणं सोपं नाही, ५ कारणं

    एमआयडीसीमध्ये गोविंद इंडस्ट्रीज या चटई कारखान्यातून गुरुवारी रात्रपाळी करून खोलीवर आलेले रवींद्र टेंगरी प्रसाद (वय ४९, रा. उत्तर प्रदेश) यांचा झोपेतच मृत्यू झाला. दुसऱ्या घटनेत नशिराबाद येथे खंडेराव मंदिराच्या ओट्यावर एका ७६ वर्षीय वृद्ध व्यक्तीचा मृतदेह आढळला. वामन भगवान लकडे (वय ७६, रा. हनुमान मंदिर परिसर, रायपूर, जिल्हा बुलढाणा) असे त्यांचे नाव आहे. थंडीमुळे गारठून त्यांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केकरिश्मा भुर्के, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सिनीअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. मागील ३ वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्समध्ये कार्यरत. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, त्यानंतर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.… आणखी वाचा