Maharashtra Weather Today : मुंबईसह राज्यभरातही थंडीचा कडाका वाढला आहे. 7 जिल्ह्यांमध्ये थंडीच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. अनेक शहरातील तापमान 10 अंशांपर्यंत आलं आहे.
हवामान खात्याने मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट पसरणार असल्याचा इशारा दिला आहे. धुळे, नाशिक, नंदुरबार, अहिल्यानगर, पुण्यात तसंच सोलापूर आणि जळगावात तापमानाचा पारा खाली उतरुन थंडीच्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. राज्यभरात किमान तापमानाचा पारा 15 अंशांखाली गेला आहे.
Mumbai Weather Update : मुंबई गारठली, पारा 15 अंशांखाली; यंदाच्या मोसमातील किमान तापमानाची नीचांकी नोंद
मुंबईतही शुक्रवारी पहाटेपासून थंडी वाढली आहे. शनिवारीही मुंबईचं किमान तापमान 15 अंशांच्या आसपास होतं. रविवारी तापमानात काहीशी वाढ होण्याची शक्यता आहे. किमान तापमान 18 अंशापर्यंत असेल असा अंदाज आहे. मात्र 31 डिसेंबरपर्यंत हवामान थंड राहील, तापमानाचा पारा कमीच राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
मुंबई महापालिकेच्या सोडतीतील 373 सदनिकांचे विजेते जाहीर, पण 53 घरं प्रतिसादाविनाघरांच्या किमती 66 लाख ते एक कोटी
जळगावातील दोघांचा थंडीने मृत्यू
जळगाव जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून शीतलहर कायम आहे. किमान तापमान ७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने जिल्हावासीयांना हुडहुडी भरली आहे. दरम्यान, जळगाव तालुक्यात शुक्रवारी सकाळी रात्रपाळी करून आलेल्या कामगाराचा, तर दुसऱ्या घटनेत नशिराबाद येथे मंदिराच्या ओट्यावर वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या दोघांचा कडाक्याचा थंडीमुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकीय सूत्रांनी वर्तवला आहे.
भाजपनं फिल्डींग लावली, पण मुंबई मनपा निवडणुकीत ठाकरेंना हरवणं सोपं नाही, ५ कारणं
एमआयडीसीमध्ये गोविंद इंडस्ट्रीज या चटई कारखान्यातून गुरुवारी रात्रपाळी करून खोलीवर आलेले रवींद्र टेंगरी प्रसाद (वय ४९, रा. उत्तर प्रदेश) यांचा झोपेतच मृत्यू झाला. दुसऱ्या घटनेत नशिराबाद येथे खंडेराव मंदिराच्या ओट्यावर एका ७६ वर्षीय वृद्ध व्यक्तीचा मृतदेह आढळला. वामन भगवान लकडे (वय ७६, रा. हनुमान मंदिर परिसर, रायपूर, जिल्हा बुलढाणा) असे त्यांचे नाव आहे. थंडीमुळे गारठून त्यांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे.
