Prakash Ambedkar On Maharashtra CM: त्यांनी स्वतःची ताकद आणि किमया काय आहे, हे दाखवून दिले आहे. ते पुढील दोन महिन्यांत पुन्हा मुख्यमंत्रीपदी दिसतील, असे आंबेडकर म्हणाले.
या निवडणुका शिंदे यांच्यासोबत लढणार असल्याचे भाजप नेते सांगू लागले आहेत. म्हणजेच शिंदे यांनी अमित शहांना खिशात घातले आहे. ही राज्यातील नेतृत्व बदलाची नांदी असून, पुढील दोन महिन्यांत शिंदे पुन्हा मुख्यमंत्री म्हणून दिसतील. तसे झाल्यास महाराष्ट्राला आश्चर्य वाटण्याचे कारण नाही,’ अशा शब्दांत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भाकीत वर्तविले.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘वंचित’च्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आढावा बैठक शनिवारी झाली. त्या वेळी ॲड.आंबेडकर यांनी मार्गदर्शन केले. तत्पूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
Ajit Pawar: 2014 चा प्रचार, 2025 ला निकाल! अजित पवारांसाठी गुडन्यूज
स्वबळावर महापालिका निवडणूक लढण्याची भाषा करणाऱ्या भाजपला माघार घ्यावी लागत आहे. शरद पवार हे चाणक्य आहेत, यात दुमत नाही. पवार आणि शिंदे यांची बैठक झाली. त्यातून जो संदेश द्यायचा तो दिला गेला असल्याकडेही ॲड. आंबेडकर यांनी लक्ष वेधले.
भाजपने नैतिकता दाखवावी
विधिमंडळामध्ये विरोधी पक्षनेते पदासाठी लागणारी सदस्य संख्या विरोधी पक्षांकडे नाही. सत्ताधारी भाजपने मन मोठे करून, राजकीय नैतिकता दाखवून विरोधी पक्षांपैकी मोठ्या पक्षाला विधानसभा व विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेतेपद द्यायला हवे होते. मात्र, तसे झाले नाही. कारण भाजपला सर्वच पक्ष संपवायचे असल्याचे ॲड. आंबेडकर यांनी नमूद केले.
Pune Crime: बनावट औषधांचा FDAकडून पर्दाफाश; परराज्यांतील विक्रेत्यांकडून लेबल बदलून विक्री, पुण्यात खळबळ
विदर्भाचा प्रश्न तीव्र होणार
वेगळ्या विदर्भाचा मुद्दा अचानक चर्चेत आला असून, त्याबाबत विचारता, ‘महाराष्ट्रात ऊस आणि कापूस ही दोन महत्त्वाची पिके आहेत. कापसाला योग्य भाव नाही. राज्याचे प्रमुख असलेले मुख्यमंत्री विदर्भातील आहेत. तरीही कापसाच्या भावाकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे वेगळ्या विदर्भाचा प्रश्न दिवसेंदिवस तीव्र होणार आहे,’ असे ॲड. आंबेडकर यांनी सांगितले.
Baramati Crime: बारामतीत सरपंच महिलेच्या पतीला मंदिराच्या पायऱ्यांवरच संपवलं; तरुणाला घडली जन्मभराची अद्दल, कोर्टाचा दणका!
भाजप सोडून सर्वांशी युती-आघाडी
राज्यातील नगर पालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुकीत ‘वंचित’ने भाजप सोडून विविध राजकीय पक्षांसोबत युती व आघाडी केली आहे. त्यानुसार महापालिका निवडणुकाही ‘वंचित’ युती किवा आघाडीच्या माध्यमातूनच लढणार आहे. खेळ आता सुरू झाला आहे. यापुढे काय होते, हे पाहून आम्ही राजकीय भूमिका घेऊ. राज्यासाठी एकच धोरण ठरवता येणार नाही. त्यामुळे भाजप सोडून सर्व, डावे-उजवे पक्ष आम्हाला चालतील, असेही ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.
