• Sun. Mar 8th, 2026

    Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख यांच्या प्रकरणाला आज एक वर्ष पूर्ण, अण्णाच्या लेकीचा निर्धार ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान

    Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख यांच्या प्रकरणाला आज एक वर्ष पूर्ण, अण्णाच्या लेकीचा निर्धार ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान

    Beed News : केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येला एक वर्ष पूर्ण झाले आहे. अपहरण करून अमानुषपणे हत्या झालेल्या देशमुख यांच्या कुटुंबीयांना अजूनही न्यायाची प्रतीक्षा आहे. त्यांची कन्या वैभवी देशमुख वडिलांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    बीड : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. समाजकार्यात सक्रिय असणाऱ्या या युवा सरपंचाचे अपहरण करून त्यांची अमानुषपणे हत्या करण्यात आली होती. या दुःखद घटनेला एक वर्ष लोटले असले तरी, देशमुख कुटुंबीयांच्या डोळ्यातील अश्रू थांबलेले नाहीत. आणि त्यांच्या मनातील न्यायाची प्रतीक्षा अजूनही कायम आहे. संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख यांनी वडिलांच्या आठवणींना उजाळा देताना आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. आठवणीने आज हे अश्रू थांबत नाहीत. आठवण या पावले पावले येतात, कुठल्या आठवणी सांगायच्या?” अशा शब्दांत वैभवी यांनी आपले दुःख व्यक्त केले. वडिलांच्या प्रत्येक क्षणाची आठवण त्यांना आजही तीव्र वेदना देत आहे. असं मयत सरपंचाची कन्या वैभवी देशमुख हिने व्यक्त केले.

    वडिलांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार

    वैभवी देशमुख यांनी आपल्या वडिलांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा पुढे नेण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला. त्या म्हणाल्या, वडिलांनी आमच्यासाठी कमी, मात्र भावासाठी आणि समाजासाठी स्वप्न पाहिलं होतं. त्यांच्या विचाराचा वारसा पुढे घेऊन जाणार आहे. संतोष देशमुख हे केवळ कुटुंबासाठी नाही, तर संपूर्ण गावांसाठी आणि समाजासाठी झटणारे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या कार्यकाळात मस्साजोग ग्रामपंचायतीला अनेक पुरस्कार मिळाले होते.
    Maharashtra Times‘वाल्मीक कराडला फाशी होत नाही, तोपर्यंत शांत बसणार नाही’, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा निर्धार

    न्याय न मिळाल्याची खंत

    हत्याकांडाला एक वर्ष पूर्ण झाले असले तरी, आपल्या वडिलांना न्याय मिळाला नाही, अशी खंत वैभवी यांनी यावेळी बोलून दाखवली. या प्रकरणातील आरोपींना कठोर शासन व्हावे आणि पीडित कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळावा, अशी त्यांची मागणी आहे. या हत्येने केवळ एका कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण तालुक्याला आणि राज्याला हादरवून सोडले होते. संतोष देशमुख यांच्या पहिल्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने, संपूर्ण देशमुख कुटुंब आणि त्यांचे हितचिंतक आज त्यांच्या आठवणींना विनम्र अभिवादन करत आहेत आणि त्यांना लवकरात लवकर न्याय मिळो,अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत.

    हरिश मालुसरे

    लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. 2020 पासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहेत. राजकीय, स्पोर्ट्स, आणि क्राईम या विषयांच्या बातम्यांमध्ये विशेष आवड. पुण्यातील आबासाहेब गरवारे महाविद्यालयात पत्रकारितेमध्ये आपली पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर थोडक्यात, झी २४ तास, टीव्ही९ मराठी या माध्यमांमध्येही ऑनलाईन टीममध्ये काम केले आहे.… आणखी वाचा