Jalna Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच, जालन्यामध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे.
याप्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा मयताच्या नातेवाईकांनी घेतला आहे, असं आई रुक्मिणाबाई आगलावे आणि मामेभाऊ कृष्णा घायाळ यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’शी बोलताना म्हटलं आहे. याप्रकरणी घटनास्थळी कदम जालना पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली असून आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना झाली असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली आहे आणि पुढील तपास सुरू आहे.
Pune Crime: पुण्यातील डॉक्टरांचा प्रताप! महिलेची प्रसुती केली, पण टॉवेल पोटातच ठेवला; कुटुंबाचा आनंद क्षणात विरला, आता…
विद्यार्थिनी थेट तिसऱ्या मजल्यावर गेली अन्
जालन्यातून एक धक्कादायक घटना समोर आलीय, शाळेच्या छतावरून आठवीत शिकणाऱ्या 13 वर्षीय विद्यार्थिनीने आज सकाळी 8 वाजेच्या सुमारास शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केलीय. सकाळीच ती नियमित शाळेत आली, शाळेची प्रार्थना झाली, सर्व मुली आपापल्या वर्ग खोलीत गेल्या. मात्र, मयत विद्यार्थिनी प्रार्थनेनंतर तिसऱ्या मजल्यावर वर्ग खोलीकडे जाताना या खोलीबाहेरील गॅलरीमधून थेट खाली उडी मारली, सदर घटना ही शिक्षकांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ तिला खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आलं.
मोठी बातमी! देवदर्शनासाठी निघालेल्या भक्तांच्या गाडीला भीषण अपघात, 5 जण जागीच ठार, 8 जखमी
सदर घटना ही वाऱ्यासारखी संपूर्ण जालना शहरात व परिसरात पसरली व पोलिसांना सुद्धा याची माहिती शाळेकडून देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी करत पंचनामा केला आहे. तर आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट असलं तरी शाळेतील मुलांच्या छेडछाडीला कंटाळून आणि शिक्षकांच्या दुर्लक्षामुळे मुलीने आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केलाय. काही दिवसांपूर्वी आरोहीला शाळेतीलच काही विद्यार्थी त्रास देत होते याची तक्रार आरोहिणी शिक्षकांकडे केली होती. मात्र शिक्षकांनी तिच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केली आणि तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं असा आरोप आरोहीच्या वडिलांनी केला आहे.
