Sangli student ends life: दिल्लीतील सेंट कोलंबस शाळेतील शिक्षकांच्या जाचाला कंटाळून दहावीच्या मराठी विद्यार्थ्याने आत्महत्या केली. राजेंद्रनगर मेट्रो स्टेशनवरून उडी मारण्यापूर्वी त्याने शिक्षकांनी मानसिक छळ केल्याचे नमूद केले.
शरदचे वडिली सांगलीच्या खानापूर तालुक्यातील ढवळेश्वरचा मूळ रहिवासी असला तरी, ते अनेक वर्षांपासून सोन्या–चांदीच्या गलाई व्यवसायानिमित्त दिल्लीतील राजीव नगर भागात स्थायिक आहेत. शरद तेथेच त्यांच्यासोबत वास्तव्यास होता आणि सेंट कोलंबस विद्यालयात दहावीत शिकत होता.
Sangli Crime : आई सॉरी, तुझं मन अखेरचं दुखावतोय… सांगलीच्या विद्यार्थ्याने दिल्लीत जीव दिला, चिठ्ठीत चार शिक्षिकांची नावं, गरज पडली तर माझं…
मंगळवार, 18 रोजी राजेंद्रनगर मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरून त्याने खाली उडी घेतली. पोलिसांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले, पण डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. दुर्दैवाने, त्याचे वडील त्या दिवशी कामानिमित्त गावी ढवळेश्वरला गेलो होतो. ही बातमी मिळताच ते तातडीने दिल्लीला परतलो. शरदचे अंत्यसंस्कार आज गावी करण्यात आले.
त्याच्या वडीलांनी सांगितले की, ‘गेल्या 8–10 महिन्यांपासून माझ्या मुलाचा शाळेत मानसिक छळ चालू होता. शिक्षकांनी चार दिवसांपूर्वीच त्याला टीसी देण्याची धमकी दिली होती. बोर्डाचे वर्ष असल्याने आम्ही शांत राहिलो; प्रकरण वाढवू नये म्हणून कुठलीही कारवाई केली नाही. पण छळ थांबला नाही. घटनेच्या अवघ्या एक दिवस आधी, ड्रामा क्लासदरम्यान शरदचा पाय घसरून तो पडला. तेव्हा शिक्षकांनी त्याला,…तू ये रोने का ड्रामा बंद कर, मुझे कोई फर्क नहीं पड़ेगा… असे म्हणत संपूर्ण वर्गासमोर अपमानित केले.
शरदच्या दीड पानी सुसाइड नोटमध्ये “शिक्षिकांनी मानसिक छळ केल्यामुळे मी आत्महत्या करीत आहे” असे स्पष्ट लिहिले आहे. या नोटच्या आधारे राजा गार्डन मेट्रो पोलिसांनी प्राचार्या अपराजिता पाल आणि शिक्षिका मनू कालरा, युक्ती महाजन व ज्युली व्हर्गिस यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरण, फडणवीसांनी चौकशी लावली, जयंत पाटील यांची सावध प्रतिक्रिया
पुढे त्याचे वडिल म्हणाले, ‘आज मी एक वडील म्हणून एवढीच मागणी करतो माझ्या मुलाच्या बाबतीत जे घडलं ते इतर कोणत्याही मुलाच्या बाबतीत घडू नये. ज्यांनी त्याला त्रास दिला, मानसिक छळ केला, त्या सर्वांना शिक्षा व्हावी. माझं मूल लहान, संवेदनशील होतं. मी शिक्षकांना वेळोवेळी सांगितलं होतं, पण तरीही त्याचा छळ थांबवला गेला नाही. शरदचं आयुष्य हिरावून घेतलेल्या या अन्यायाचा शेवट न्यायानेच व्हायला हवा.’

