शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली असून याबाबत कोणत्याही प्रकारचा संभ्रम ठेवण्याचे कारण नाही, असं फडणवीस म्हणाले. काहीजण अफवा पसरवून शेतकऱ्यांमध्ये गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत असं फडणवीस म्हणाले.सरकारची भूमिका स्पष्ट असून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा ठाम निर्णय घेण्यात आला आहे असं फडणवीसांनी सांगितलं.