मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२६-२७ वर्षाचा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी २ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीची घोषणा करण्यात आली. मात्र या अर्थसंकल्पावर समाधानी नसल्याचे म्हणत विरोधक टीका करत आहेत.विरोधकांच्या टीकेला मंत्री छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिले आहे. संपूर्ण अर्थसंकल्प सगळ्या घटकांना स्पर्श करणारा असल्याचे मत भुजबळांनी व्यक्त केले.