शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना तातडीने कर्जमाफी मिळावी अशी ठाकरेंची मागणी आहे. ‘दगाबाज रे’ म्हणत उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस सरकारवर टीका केली आहे. बुधवारी (५ नोव्हें.) पैठणमधील नांदर गावात ठाकरेंनी शेतकऱ्यांना संबोधित केलं.मी हाक देईन तेव्हा आंदोलनाला या, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी केले. ठाकरेंच्या या आवाहनाला शेतकऱ्यांकडूनही प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय.