Ratnagiri News : ठाकरे गटाचा बडा नेता पुन्हा भाजपमध्ये जाणार असल्याचा दावा शिंदेंच्या नेत्याने केला आहेॉभाजप प्रवेशासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. मात्र, त्या नेत्याने हा आरोप फेटाळून लावत, आपण उद्धव ठाकरेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे स्पष्ट केले.
उबाठाच्या लोकांनी काही दिवसांपूर्वी माझ्या विरोधात पत्रकार परिषद घेतली जे माझ्यासमोर चार चार वेळा उभे होते जसं मुघलांच्या काळामध्ये जसे संताजी धनाजी दिसायचे कुठे गेले तरी सुद्धा तसंच या लोकांना मी दिसतो. त्यांनी मला विचारलं की तुम्हाला भूमिपूजन करायला एकदा शिंदेंना का आणावा लागले असं सवाल बाळ माने यांनी विचारला होता या टीकेचा समाचार घेतला. तुम्हाला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे पीए अनिकेत पटवर्धन का लागतात त्यांच्यामार्फत भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या गोष्टी का करता? काही लोक भाजपातील माझ्याकडे पाठवता मी भाजपा मध्ये येतोय मला घ्यायला सांगा म्हणून हे कशासाठी त्याच्यामुळे राजकारणात तुम्ही युबीटी मध्ये काम करताय उद्धवजींचे नेतृत्व तुम्ही स्वीकारलंय तुम्ही त्यांचं काम करा, असा सल्ला उदय सामंत यांनी बाळ माने यांना दिला आहे. इकडे खड्डे पडले तिकडे खड्डे पडले या सगळ्यासाठी मी सक्षम आहे हे सगळं करून तुम्ही माझ्याबरोबर चार वेळा उभे राहिले होतात त्यामुळे रत्नागिरीकर यांनी तुम्ही काय आणि मी काय हे दाखवून दिला आहे, असं उदय सामंत म्हणाले.
Ratnagiri Crime : दोन वर्षांआधी लग्न, फोन केला की सून बोलायची ते बाहेर, एक दिवस बोलली ते वारले, रत्नागिरीत खळबळ, प्रकरण काय?
देशातील उभारण्यात आलेल्या पहिलेच भारतरत्नांच्या शिल्पांच अनावरण करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आले होते आणि त्याचा मला अभिमान आहे पण मी अनिकेत पटवर्धन की जे रवींद्र चव्हाण यांचे पीए आहेत त्यांच्याकडे माझा प्रवेश घ्या प्रवेश घ्या मला काहीतरी मिळवून दया यासाठी मी कधीच गेलो नाही आणि माझ्याकडे काही जण आले की हे बीजेपी मध्ये गेले तर त्यांना अडचण करू नका हे देखील माझ्याकडे पुरावे आहेत असा मोठा दावा उदय सामंत यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.
Uday Samant : ‘जर कोणाला खुमखुमी असेलच तर धनुष्यबाण कसा…’; कोकणात उदय सामंतांकडून भाजप-राष्ट्रवादीचा समाचार, कारण काय?
या सगळ्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे उपनेते माजी आमदार बाळ माने यांच्याकडे त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे उपनेते माजी आमदार बाळ माने यांच्याकडे त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, सामंत आता भाजपाचे प्रवक्त्याची काय अशी मला शंका येऊ लागली आहे. माझ्या वडिलांनी वीस वर्ष तर मी स्वतः चाळीस वर्ष भाजपचं काम केलं आहे. मात्र भाजपवर शिंदेसेनेने अतिक्रमण केले आमच्यावर अन्याय झाला त्यावेळेला मी भाजपच्या सगळ्या नेत्यांना सांगून पक्ष सोडला आहे. आणि आता मी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आहे तो आताअखेरपर्यंत असणार आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचा दहा वर्षे आमदार होऊन आयत्यावेळी फॉर्म शिवसेनेचा भरणारा मी नाही आदित्य ठाकरे यांच्याबरोबर अर्धी फ्रँकी खाऊन गुवाहाटी येथे जाऊन गद्दारी करणारा मी नाही त्यामुळे रत्नागिरीला रस्त्यांवरती पडलेले खड्डे या विषयाला उत्तर देण्याचे सोडून उदय सामंत यांनी ही सोडलेली नवी पुडी असल्याची प्रतिक्रिया बाळमाने यांनी दिली आहे.

