Nanded News : क्रिकेटचा नाद जीवावर बेतला असून त्याचा मृत्यू झाला आहे. दिपावलीच्या सणावेळी घरातील तरूण मुलगा गेल्याने दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्यासोबत नेमकं काय घडलं जाणून घ्या.
शेख अल्ताफ शेख खय्युम हा वाजेगाव परिसरातील इकबालनगर येथील रहिवासी आहे. मंगळवारी तो आपल्या मित्रांसोबत क्रिकेट खेळण्यासाठी वाजेगाव येथे गेला होता. क्रिकेट खेळत असताना विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. पावसापासून बचाव करण्यासाठी तो झाडा खाली थांबला. यावेळी अचानक त्याच्यावर वीज कोसळली. अंगावर वीज कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. शिवाय खिशात असलेला मोबाईल देखील जळून खाक झाला. शेख अल्ताफ हा गुत्तेदार होता. शिवाय त्याला क्रिकेटची आवड होती. मित्रासोबत तो नेहमी क्रिकेट खेळण्यासाठी जायायचा. या दुर्दैवी घटनेमुळे इकबालनगर, धणेगाव आणि वाजेगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Nanded Accident : मुलगी बघायला जाताना कारचा अपघात; संसार सुरू होण्याआधीच काळाचा घाला; बापाच्या डोळ्यादेखत बहीण, भावाचा अंत
शहरासह जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी
ऐन दिवाळीच्या उत्साहावर पावसाने विरजण घातले आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मंगळवारी नांदेड शहरासह जिल्ह्यातील लोहा, हिमायतनगर, मुदखेड आदी तालुक्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे सोयाबीन-कापूस या हाताशी आलेल्या पिकाचे नुकसान झाले आहे. तसेच फटाका बाजाराला याचा फटका बसला आहे. मागील दोन दिवसांपासून पुन्हा वातावरण बदलले आहे. ढगाळ वातावरणामुळे ऐन दिवाळीत शेतात सोयाबीन काढणीला वेग आला आहे. कापूस फुटला आहे. पण पावसाठी वातावरणामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. पावसामुळे शेतात कापणी करून टाकलेल्या सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. ऐन दिवाळीत पडलेल्या या पावसमुळे या परिसरातील शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे.

