Ratnagiri News : रत्नागिरी जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री उदय सामंत यांनी महायुतीतील भाजप व राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. सामंत यांनी टीका करणाऱ्यांना आक्रमक शैलीत उत्तर देण्याचे संकेत दिले.
चिपळूण मधील महायुतीमधील काही म्हणत आहेत की, आम्ही स्वबळावर लढणार आहोत आम्ही जिंकलेलो आहोत, आमच्याकडे ही संस्था आहे. आमच्याकडे ती संस्था आहे आमच्याकडे तीस हजार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलो आहोत. तर काही म्हणतात शाळांमधून 28 हजार जणांपर्यंत पोहोचलो आहोत माझी आपल्याला विनंती आहे की आपण महायुती म्हणूनच निवडणूक लढवायची आहे पण जर कोणाला खूमखुमी असेलच तर आपल्या धनुष्यबाण कसा चालतो हे त्यांना दाखवावे लागेल अशा शब्दात सामंतांनी सुनावले.
Ratnagiri News: माझ्या मुलीचा खूप छळ केला, लेक गमावलेल्या आईने काय-काय सांगितलं? रत्नागिरी विवाहिता मृत्यू प्रकरणात नवी माहिती
विधानसभेच्या निवडणुकीला जर शिवसैनिकांनी प्रामाणिकपणे काम केलं नसतं तर काय परिस्थिती झाली असती हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीलाही माहिती आहे निवडून आलेल्या उमेदवारांना ही माहिती आहे आणि आपल्या सगळ्यांना देखील माहिती आहे असा टोला त्यांनी चिपळूण येथील आमदार शेखर निकम यांना लगावला.
Ratnagiri Crime : लोटे गुरुकुलच्या कोकरे महाराजाचा पाय खोलात, अत्याचाराचा आणखी एक आरोप, अल्पवयीन पीडितेच्या आत्यावरही गुन्हा
अलीकडेच काही दिवसापूर्वी महाविकास आघाडी मधून विधानसभेला निवडणूक लढवलेले प्रशांत यादव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे त्यांनाही सामंतांनी खडे बोल सुनावले आहेत. काही लोकांना पंधरा दिवसांपूर्वी शिंदे साहेब त्यांना चांगले होते माझ्याबरोबर माझे मोठे बंधू किरणभैया सामंत यांच्याबद्दलही आपुलकी प्रेम होत पण काही मंडळींनी सांगितलं की त्यांची चौकशी लागेल म्हणून ते दुसऱ्या पक्षामध्ये गेले की चौकशी लागलेली थांबवण्यासाठी दुसऱ्या पक्षात गेले ते मला माहिती नाही पण ठीक आहे तुमचं काय वैयक्तिक राजकारण आहे त्याच्याशी आम्हाला काही देणे घेणे नाही पण शिवसेनेला डिवचण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर शिवसेना काय आहे हे दाखवण्याची जबाबदारी तुमची आणि आमची सगळ्यांची आहे असं सांगत त्यांनी पदाधिकाऱ्यांनाही टीका करणाऱ्यांना आक्रमक शैलीत उत्तर देण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
शेतात कापणीवेळी तरुणावर नियतीचा घाला, भात काढताना कोसळला आणि… तीन वर्षाच्या चिमुकल्याचं पितृछत्र हरपलं; रत्नागिरीत हळहळ
यापुढे स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत आपल्या पक्षाचे मुख्य नेते शिंदे साहेब सांगतात की महायुती म्हणून आपल्याला निवडणुका लढवायच्या आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही महायुतीनेच निवडणुका लढवायचे आहेत असं सांगत आहेत उपमुख्यमंत्री अजित दादा ही महायुती करायचं सांगत आहेत शिंदे साहेबांनी परवा रत्नागिरीमध्ये आपल्याला महायुतीचाच भगवा फडकवायचा आहे असे सांगितले आहे. मीही महायुतीच्या समन्वय समितीमध्ये आहे मात्र स्वबळाची भाषा करायची की महायुतीमध्ये लढायचं हे बोलण्याचा अधिकार मला नाही आणि काल-परवा महायुतीमध्ये बाहेरून आलेल्याना तर नाहीच नाही अशा शब्दात उदय सामंत यांनी चिपळूण येथील बैठकीत महायुतीमधील भाजप व राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांच्या समाचार घेतला आहे.

