BJP MLA Shivaji Kardile Death : ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने शिवाजी कर्डीले यांची प्राणज्योत मालवली
मोठ्या आजारातून ते नुकतेच बरे झाले होते. पहाटे त्यांना त्रास होऊ लागल्याने नगर शहरतील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले, तेव्हा डॉक्टरांनी निधन झाल्याचे सांगितले. शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाने कुटुंबीयांसह समर्थकांवर शोककळा पसरली आहे.
नगर तालुक्यातील बुऱ्हाणनगर या गावातील शिवाजी कर्डिले यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे. दूध उत्पादक शेतकरी, गावात सरपंच, आमदार, राज्यमंत्री असा त्यांचा मोठा राजकीय प्रवास राहिला आहे.
कोण होते शिवाजीराव कर्डीले ?
शिवाजीराव कर्डीले २००९ मध्ये भारतीय जनता पक्षाकडून उभे होते. त्यांनी ५७ हजार ३८० मतं मिळवून विजय संपादन केला होता. २०१४ मध्येही ९१ हजार ४५४ मतांनी विजय मिळवला होता.
Maharashtra Politics : आम्ही युती तोडणारे नाही, पण चिंता एकच की… भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य, शिवसेनेत अस्वस्थता
सुरुवातीला त्यांनी आपला दुधाचा व्यवसाय सुरू केला. काही काळ ते गावचे सरपंच राहिले होते. त्यानंतर अपक्ष म्हणून आमदारकीसाठी उभे राहिले आणि निवडूनही आले. जमिनीचे व्यवहार, बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्याचा पुरवठा आणि हॉटेल उद्योग यामुळे त्यांचे नाव संपूर्ण जिल्ह्याभरात झाले. २०१४ च्या निवडणुकीत कर्डिले यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुरीमध्ये जाहीर सभा घेतली होती. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावे लागते.
यापुढे महामानवाचा अवमान केला तर हिंदू बांधव… गोपीचंद पडळकरांचं सणसणीत भाषण!
Amit Shah : नितीश कुमार तेव्हा म्हणालेले; मोदीजी, बिहारमध्ये भाजपचाच CM करा, पण… शाहांनी ‘अंदर की बात’ सांगितली
कुटुंब राजकारणात
शिवाजीराव कर्डिले यांची एक मुलगी भानुदास कोतकर यांच्या घरात, तर दुसरी अरुण जगताप यांच्या घरात आणि तिसरी मुलगी शिवसेनेच्या गाडे परिवारात दिलेली आहे. अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप आणि माजी महापौर संदीप कोतकर हे कर्डिले यांचे जावई आहेत. आता कर्डिले यांचे पुत्र अक्षय यांनी राजकारणात प्रवेश केला आहे.

