राज्यभरात दिवाळीचा उत्साह आहे. अशात मुंबईसह उपनगरात बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबईत पावसाने हजेरी लावली. भर दिवाळीच्या तोंडावर खरेदी करताना याचा नागरिकांसह, व्यापाऱ्यांनाही मोठा फटका बसला. पावसाने अनेक लहान-मोठ्या व्यापाऱ्यांचं नुकसान झालं आहे. परतीचा पाऊस गेल्याचं हवामान खात्याने जाहीर केलं होतं. मात्र काल गुरुवारी अचानक आलेल्या पावसाने बाजारपेठांमध्ये मोठा गोंधळ उडाला. दुसरीकडे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स
