• Fri. Mar 6th, 2026
    Raigad News: दिवाळीचा उत्साह ओला! अचानक कोसळलेल्या पावसाने फटाका विक्रेत्यांचं प्रचंड नुकसान

    Raigad: रायगड जिल्ह्यात दिवाळीच्या तोंडावर अवकाळी पावसाने हजेरी लावली. सायंकाळच्या सुमारास झालेल्या जोरदार फटाके, कंदील आणि पणत्या विक्रेत्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अमुलकुमार जैन, रायगड : दिवाळीचा जल्लोष सुरू होण्याआधीच सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास सुरू झालेल्या अवकाळी पावसाने रायगड जिल्ह्यातील बाजारपेठा अक्षरशः भिजवून टाकल्या आहेत. दरम्यान, हवामान खात्याने पूर्वसूचना दिली होती. पण, इतक्या जोरदार पावसाची अपेक्षा नव्हती. या पावसाच्या परिणामी फटाक्यांची दुकाने, कंदील विक्रेते आणि मातीच्या पणत्यांचे व्यावसायिकांची अक्षरशः धांदल उडाली.

    या पावसाचा फटका अलिबाग, पेण, पनवेल, मुरुड, कर्जत आणि माणगाव परिसरात रस्त्याच्या कडेला उभारलेल्या स्टॉल्समध्ये पावसाचे पाणी घुसल्याने मोठ्या प्रमाणावर फटाका मालाचे नुकसान झाले. फटाक्यांच्या बॉक्सवर पाणी गेल्याने त्यांचा दर्जा खराब झाला, तर रंगीबेरंगी कंदील ओले होऊन फाटले. मातीच्या पणत्या तयार करून विक्रीसाठी आणलेल्या कारागीरांचे तर सर्वाधिक नुकसान झाले आहे. अनेक पणत्या पाण्यात विरघळल्या किंवा तुटल्या.
    Maharashtra Timesकर्जतमध्ये भावकीच उठली जीवावर, २३ वर्षीय तरुणाला घरात घुसून मारहाण, जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू
    यावेळी अनेक व्यापाऱ्यांनी सांगितले की, “सायंकाळी पाऊस सुरू होताच आम्ही माल झाकण्यासाठी प्लास्टिक शीट्स टाकल्या, पण वाऱ्याच्या झोकामुळे काहीच उपयोग झाला नाही.”

    दरम्यान, हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील ४८ तासांपर्यंत जोरदार पावसाचा इशारा कायम आहे. यामुळे दिवाळीच्या खरेदीवर आणि बाजारपेठेतील उलाढालीवर थंडावा येण्याची शक्यता आहे. सध्या व्यावसायिक आणि कारागीर सरकारकडून नुकसान भरपाई आणि संरक्षणात्मक उपाययोजनांचीही मागणी करत आहेत.
    एकंदरीत, या वर्षीचा पाऊस “दिवाळीचा पाहुणा” ठरला असून, उत्साहावर पाणी फेरले आहे.

    दरम्यान, राज्यात इतरही काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. रात्री आठच्या सुमारास मुंबईतही हलक्या सरी बरसल्या. ठाणे, कल्याण आणि बदलापूरमध्येही पावसाने हजेरी लावल्याची पाहायला मिळाले आहे.

    सगळं लुटलं, स्वप्न उद्ध्वस्त… सराफाच्या फसवणुकीनं महिलांच्या डोळ्यात अश्रू!

    राज्यात सप्टेंबर महिन्याच झालेल्या पावसानेही शेतकऱ्यांना अडचणीत आणलं आहे. विशेषतः मराठवाड्यातील शेतकऱ्यांना या पावसाचा मोठा फटका बसला होता. शेतकऱ्यांच्या शेतीपिकांसह पशुधनाचंही नुकसान झालं होतं. त्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास अतिवृष्टीने हिरावून घेतला होता. त्यामुळे, फटाका विक्रेत्यांनाही यावेळी पावसाने अडचणीत आणल्याचं चित्र निर्माण झालं आहे. त्यामुळे दिवाळीचे पुढचे काही दिवस या व्यावसायिकांसाठी अत्यंत महत्वाचे ठरणार आहेत.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा