• Mon. Mar 9th, 2026

    Pune Crime: पुण्यात रात्री उशिरा मित्रांमध्ये वाद; प्यासा हॉटेलसमोर राडा, पहाटे तिघांनी मिळून तरुणाला संपवलं!

    Pune Crime: पुण्यात रात्री उशिरा मित्रांमध्ये वाद; प्यासा हॉटेलसमोर राडा, पहाटे तिघांनी मिळून तरुणाला संपवलं!

    Pune Murder Case: पुण्यातील वाघोली परिसरात मध्यरात्री किरकोळ वादातून मित्रांनीच मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बादल शेख या तरुणाची चाकूने वार करून आणि डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली.

    पुण्यात मित्रानेच मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    पुणे: पुणे शहर आणि परिसरात मागील काही वर्षांपासून वाढत असलेली गुन्हेगारी चिंतेचा विषय ठरत आहे. क्षुल्लक कारणावरून वाद विकोपाला जाऊन थेट हत्येपर्यंतच्या घटना समोर येत असून यात प्रामुख्याने तरुणांचा सहभाग असल्याचं दिसत आहे. अशीच एक घटना पुण्यातील वाघोली परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास घडली असून मित्रानेच मित्राचा खून केल्याचे उघड झाले आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, प्यासा हॉटेलसमोर मित्रावर तरुणावर चाकूने वार करून त्याची हत्या केली. या हल्ल्यात बादल शेख या तरुणाचा मृत्यू झाला असून मृत आणि आरोपी हे दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. बादल शेख याचा खून त्याच्याच 3 मित्रांनी केला असल्याचंही पोलीस तपासात समोर आलं आहे. खून केल्यानंतर आरोपी फरार झाला असून वाघोली पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.

    Maharashtra Timesकॉलेज तरुणीला बाईकने रूमवर नेलं, नंतर आवाज ऐकून शेजारी हादरले; अहिल्यानगरमधील घटनेनं खळबळ

    वाघोली भागात असलेल्या उबाळे नगर परिसरात हॉटेल प्यासा समोर पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास ही घटना घडल्याचे समजते. मृत तरुणाबरोबरच आरोपीदेखील रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारी रात्री उशिरा खराडी परिसरात या मित्रांमध्ये किरकोळ कारणातून वाद झाला होता. या वादाचे रूपांतर पुढे जोरदार भांडणात झाले, त्यानंतर त्यांनी एकमेकांना शिवागाळ करण्यास सुरुवात केली. या वादावादीत तिन्ही आरोपींनी बादल शेख याच्यावर वार करून त्याच्या डोक्यात दगड घातला.

    या मारहाणीत बादल शेख हा गंभीर जखमी झाल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. याप्रकरणी आमची चौकशी सुरू असून आरोपी लवकरच ताब्यात घेऊ, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

    दरम्यान, पुणे शहरासह जिल्ह्यात हत्येच्या घटनांमुळे प्रचंड वाढ झाल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाऊ लागलं आहे. तरुणांमध्ये किरकोळ कारणातून होणाऱ्या हत्येच्या घटना, तसंच टोळीयुद्धातून होणारे खून या सगळ्या घटनांमुळे शहरातील कायदा-सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा