राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी ‘मातोश्री’ निवासस्थानी दाखल झाले. त्यामुळे पुन्हा एकदा दोन्ही ठाकरे बांधव एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी दाखल झाले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट सर्वात महत्त्वाची मानली जात आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं, अशी लाखो मराठी नागरिकांची भावना आहे. या लाखो नागरिकांची आणि दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची इच्छा पूर्ण होण्याची आता शक्यता आहे. विशेष म्हणजे दोन महिन्यांपासूनची राज आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीची ही पाचवी वेळ आहे.
उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्या नातूचा नामकरणाचा कार्यक्रम आज मुंबईतील बीकेसी येथील एका सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचं उद्धव ठाकरे यांच्यासह राज ठाकरे यांनादेखील निमंत्रण होतं. या कार्यक्रमाला दोन्ही ठाकरे बांधवांनी हजेरी लावली. हा कार्यक्रम आटोपल्यानंतर राज ठाकरे पत्नीसह उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी गेले. जवळपास अर्धातापासून जास्त वेळ ते ‘मातोश्री’मध्ये होते. दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये यावेळी जवळपास अर्धातास चर्चा झाली. यानंतर राज ठाकरे ‘मातोश्री’ येथून आपल्या घरासाठी रवाना झाले. ठाकरे बंधूंची ही कौटुंबिक भेट होती. पण या भेटीकडे राजकीय दृष्टीकोनाने देखील पाहिलं जात आहे.
(सविस्तर बातमी अपडेट होत आहे)
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा