Raigad Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्याचदरम्यान, रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जमिनीच्या वादातून येथे गोळीबार झाल्याचं समोर आलं आहे. गोळीबार करत दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
गुलाम मालदार यांचा मुलगा पुण्यावरून पोटल येथे आला होता. जमिनीच्या जागेवरून निर्माण झालेला वाद वाढला आणि फिर्यादी यांच्या राहत्या घराच्या समोरील मोकळया जागेमध्ये इस्माईल सैय्यद मालदार हे आरोपी मुफीज गुलाम मालदार यांच्याशी जागेच्या अनुषंगाने चर्चा करत होते. काल बुधवारी रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास मुफीज मालदार याच्यासोबत असणाऱ्या मुत्तीश गुलाम मालदार या मुलाने त्याच्याकडील देशी बनावटीचं पिस्तुल इस्माईल सैय्यद मालदार यांच्या दिशेने रोखून त्यांना जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने एक राउंड फायर करुन तिथून पळून गेला.
शेतकऱ्याला महिन्याला 10 हजार पगार, संपूर्ण कर्जमाफी ते 70 हजार हेक्टरी भरपाई, जरांगेंच्या सरकारकडे 8 मोठ्या मागण्या
घरगुती वादातून दहशत माजवण्यासाठी मुत्तीश याने गोळीबार केला. ग्रामस्थांनी या गोळीबाराची माहिती कर्जत पोलिसांना दिल्यानंतर पोलिस तात्काळ त्याठिकाणी दाखल झाले आणि दहशत माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना ताब्यात घेतलं. घरगुती वादातून निर्माण झालेला हा वाद गोळीबारापर्यंत पोहचला असून, ग्रामस्थांनी तिघांना स्वतः पकडून ठेवले होतं, आणि त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर पोलिसांनी तेथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करून ठेवला. या घटनेत वाद निर्माण झाल्यानंतर झालेला गोळीबार लक्षात घेऊन पोलिसांनी पळून गेलेल्या दोन आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. तर पोलिस उपअधीक्षक राहुल गायकवाड आणि प्रभारी पोलिस अधिकारी पोलिस निरीक्षक संदीप भोसले यांनी घटनास्थळी पाहणी करून स्थानिकांसोबत चर्चा केली.
Dhule Crime : गुप्तांग दुखू लागल्यानं लेकीला रडू कोसळलं; आईला सांगितला धक्कादायक प्रकार; काकानं कडी लावली अन्..
याबाबत कर्जत पोलिस ठाण्यात गु.र. नं.२५३/२०२५ भा.न्या.सं.क.१०९,१८९(१),१८९ (२),१८९ (४),१९१ (२),१९१(३),१९० ,१३१,३५२,३५१( २) सह भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३,२५,२७ नुसार गुन्हा आज सकाळी 5 वाजून 10 मिनिटाच्या सुमारास अनिस अकबर मालदार, मुफिज गुलाम मालदार (दोन्ही रा.मु.पोटलवाडी पो. गौळवाडी, ता. कर्जत जि. रायगड) इतर चार अनोळखी इसमांवर नाव गाव माहित नाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल वराटे करीत आहेत.

