शिवसेनेचे नेते तथा मंत्री उदय सामंत यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात सुरु असलेल्या घडामोडींवर प्रतिक्रिया दिली. ठाकरेंचे 6 खासदार नेमके कोणत्या पक्षात जाणार? या प्रश्नावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नांदेड : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 9 पैकी 6 खासदार हे फुटीच्या उंबरठ्यावर आहेत. ते आपला स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. पण वेगळा गट स्थापन केल्यानंतर ते कोणत्या पक्षात विलीन होणार? ते अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेलं नाही. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून ‘ऑपरेशन टायगर’ राबवली जात असल्याची चर्चा आहे. याबाबत शिवसेनेचे नेते तथा मंत्री उदय सामंत यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सूचक वक्तव्य केलं.
“नांदेडमधून दोन खासदार दिल्लीत गेले, अशी चर्चा आहे. त्यामुळे आपण संध्याकाळपर्यंत घडामोडींवर लक्ष ठेवू. संध्याकाळपर्यंत काय घडतं ते पाहू. राज्यभरातून शिवसेनेत शेकडो कार्यकर्ते प्रवेश करत आहेत. त्यामुळे आमदार, खासदार, नगरसेवकांसाठी वेगळं ऑपरेशन टायगर असा प्रयत्न आम्ही कुणी केला नाही. आता एकनाथ शिंदे दिल्लीत आहेत. त्यामुळे आपण संध्याकाळपर्यंत थांबलो तर काही गोष्ट क्लिअर होतील”, असं सूचक वक्तव्य मंत्री उदय सामंत यांनी केलं.
“खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य फार मोठा विनोद आहे. आम्ही ज्यावेळी गुवाहाटीला गेलो तेव्हाही पैसे घेतल्याचे आरोप केले. पण सर्व आमदार पुन्हा निवडून आले. याचा अर्थ एकनाथ शिंदे यांच्यावर महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वास आहे. शेवटी राजकारणात जनता ठरवत असते. मतदारांचा कौल महत्त्वाचा असतो”, असंदेखील सामंत म्हणाले.
उदय सामंत परभणीत काय म्हणाले?
उदय सामंत आज परभणीच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य केलं.”विरोधकांनी आमच्यावर टीका कधी केली नाही? विरोधक म्हणजे दोन ते तीन जण, महाराष्ट्रातील कुणी एकत्र येऊन टीका करतात, असा विषय नाही. हे टीका करणारे कोण आहेत? ज्यांनी स्वत:चा पक्ष संपवला ते आमच्यावर टीका करत आहेत”, असा टोला उदय सामंत यांनी लगावला.
“महाराष्ट्राच्या जनतेला वाटत असेल की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर यावं. एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व स्वीकारावं. त्यातून काही घडामोडी घडत असतील तर काही लोकांना पोटशूळ उठतं. पण त्या पोटशूळाचं रुपांतर कधीही त्यांच्या पक्षाच्या मतामध्ये झालेलं नाही”, अशी टीका सामंत यांनी केली. “खासदार ठाकरेंना सोडून गेले ते मला माहिती आहे. पण ते कुणाबरोबर राहणार ते अजून मला कळलेलं नाही. ते आपण आज संध्याकाळपर्यंत बघू”, असं सूचक विधान त्यांनी केलं.
उदय सामंत यांचं मतदारांना आवाहन
“सर्वप्रथम उद्याच्या मतदानामध्ये जेवढे मतदार आहेत, त्यांनी शंभर टक्के मतदान करुन, विधान परिषदेच्या निवडणुकीत सहभाग घ्यावा, अशी मी सर्व मतादारांना विनंती करतो. 17 पैकी 6 जागांवर महायुती बिनविरोध जिंकली आहे. उरलेल्या 11 जागांवरही महायुतीचे विधान परिषदेचे आमदार निवडून येतील. परभणीतही मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. परभणीतील सर्व महायुतीच्या नेत्यांशी चर्चा करुन नाशिकला जाणार”, असं उदय सामंत म्हणाले.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा