• Mon. Mar 9th, 2026
    Jalgaon News : एरंडोल मराठी केंद्राची केंद्रस्तरीय शिक्षण परिषद संपन्न, खान अ‍कॅडमीबाबत सखोल मार्गदर्शन

    Jalgaon News : जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील मराठी केंद्राची केंद्रस्तरीय शिक्षण परिषद 30 सप्टेंबर रोजी संपन्न झाली. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी बीट एरंडोल तथा शालेय पोषण आहार अधीक्षक उपस्थित होते.

    एरंडोल मराठी बातम्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    जळगाव : जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यामधील एरंडोल मराठी केंद्राची केंद्रस्तरीय शिक्षण परिषद दि. 30 सप्टेंबर मंगळवार रोजी जि. प.उच्च प्राथमिक शाळा एरंडोल नं.1 येथे संपन्न झाली. शिक्षण परिषदेचे अध्यक्षस्थानी केंद्राचे केंद्रप्रमुख हिम्मत मोरे दादा होते. सदर शिक्षण परिषदेस जे. डी. पाटील साहेब शिक्षण विस्तार अधिकारी बीट एरंडोल तथा शालेय पोषण आहार अधीक्षक एरंडोल हे उपस्थित होते. सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमापूजन करण्यात आले.

    तसेच जे.डी.पाटील साहेब यांनी प्रशासकीय सूचना दिल्या व मार्गदर्शन केले. खान अकॅडमीबाबत नवाल सर यांनी सखोल असं मार्गदर्शन केलं. नंतर केंद्रप्रमुख मोरे दादा यांनी सूचना व मार्गदर्शन केलं. सदर शिक्षण परिषदेचं आयोजन जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा भालगाव यांनी केलं होतं. शिक्षण परिषदेस केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक संजय पाटील तसेच पदवीधर शिक्षक जयश्री चौधरी, अतुल साळी व उपशिक्षक संदीप पाटील, राजश्री सपकाळे, मंगला सोनवणे, यांनी परिश्रम घेतले. यादरम्यान, सूत्रसंचालन संदीप पाटील सर यांनी केलं व आभार प्रदर्शन अतुल साळी सर यांनी केलं.

    Maharashtra Times‘मी फक्त थोडे दिवस…’; मनोज जरांगेंनी दसरा मेळाव्यात ‘तो’ शब्द उच्चारला, मराठा समाजाच्या काळजाचा ठोका चुकला, नेमकं काय म्हणाले?

    भरपाई द्या, अन्यथा गिरणेत उडी घेईन!

    केळीचे आगार असलेल्या जळगाव जिल्ह्यावर पुन्हा एकदा निसर्गाचा कोप झाला आहे. अनेकांच्या केळीबागा भुईसपाट झाल्या. यात सर्वस्व गमावलेल्या देवगाव येथील दिव्यांग केळी उत्पादक संतोष पाटील यांच्या वेदनांनी सर्वांना हेलावून सोडले आहे. ‘शासनाकडून नुकसान भरपाई मिळाली नाही, तर मी गिरणा नदीपात्रात उडी घेऊन जीव देईन,’ अशी उद्विग्नता त्यांनी व्यक्त केली.

    Maharashtra Timesतीन मुलांना मागे सोडून शेतकऱ्याचा टोकाचा निर्णय, कुटुंबावर शोककळा; हृदयद्रावक घटनेने धाराशिवमध्ये हळहळ

    नवरात्रात उपवासासाठी केळीला देशभरातून मोठी मागणी असते. जळगावची केळी देशांतर्गत आणि परदेशी बाजारपेठेत चवीसाठी प्रसिद्ध आहे. याच काळात चांगला दर मिळण्याच्या आशेने शेतकऱ्यांनी वर्षभर मेहनत घेतली होती. मात्र, अतिवृष्टीने त्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरले. तालुक्यातील देवगावसह अनेक गावांमध्ये गेल्या पाच दिवसांपासून शेतांमध्ये पाणी साचलेले आहे. जळगाव जिल्हा केळीच्या निर्यातीसाठी ओळखला जातो. मात्र, या नैसर्गिक संकटामुळे केळीच्या गुणवत्तेवर परिणाम झाल्यास निर्यातीवरही गदा येण्याची भीती आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा