नगर-मनमाड महामार्गाची नेहमीच दुरावस्था होत असल्याची समस्या कायम आहे. यामुळे वाहन चालकांना नेहमीच मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. डागडुजीचे काम सुरू असल्याने पुणतांबा फाटा येथून अवजड वाहतूक वळविण्यात आलीय.त्यातच या परिसरात खड्ड्यांचे साम्राज्य असल्याने वाहतुकीचा वेग मंदावतोय. ५-७ किलोमीटर वाहनांच्या रांगा लागत असून चालकांना मनस्ताप सहन करावा लागतोय.