• Thu. Jun 11th, 2026

    Congress News: महाराष्ट्रातील ‘नॉट रीचेबल’ काँग्रेस उमेदवार थेट रुग्णालयातील बेडवर आढळला; चर्चांबाबत केला महत्त्वाचा खुलासा

    Congress News: महाराष्ट्रातील ‘नॉट रीचेबल’ काँग्रेस उमेदवार थेट रुग्णालयातील बेडवर आढळला; चर्चांबाबत केला महत्त्वाचा खुलासा

    नागपूर : अमरावती विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे उमेदवार हर्षजीत देशमुख यांच्याबाबत काही काळ मोठा संभ्रम निर्माण झाला होता. देशमुख यांच्याशी अचानक संपर्क तुटल्याने आणि त्यांचा ठावठिकाणा लागत नसल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले होते. ते नॉट रीचेबल झाले की काय? असा प्रश्न निर्माण झाला होता. कार्यकर्ते, पदाधिकारी आणि समर्थकांकडून त्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र, काही तासांच्या चर्चेनंतर देशमुख हे नागपूरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याचे स्पष्ट झाले आणि सर्व अफवांना पूर्णविराम मिळाला.

    मिळालेल्या माहितीनुसार, 9 जून रोजी हर्षजीत देशमुख यांना अचानक तब्येत खराब झाल्याने नागपूर येथील वेदांत रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे त्यांचा काही काळ संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे ते नेमके कुठे आहेत, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता.

    दरम्यान, देशमुख यांनी स्वतः प्रकृतीविषयी माहिती देताना सांगितले की, मला दम लागणे आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णालयात दाखल करण्यात आले. अँजिओग्राफी करण्यात आली असून डॉक्टरांनी मला चार ते पाच दिवस पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. तसेच आणखी दोन दिवस निरीक्षणाखाली राहण्यास सांगितले आहे. माझ्यावर कोणत्याही प्रकारचा राजकीय दबाव नाही. सध्या माझे संपूर्ण लक्ष प्रकृती सुधारण्याकडे आहे. निवडणुकीचा प्रचार करण्याची इच्छा मी डॉक्टरांकडे व्यक्त केली होती, मात्र त्यांनी मला सध्या प्रचारासाठी परवानगी दिलेली नाही. तरीही दोन दिवसांत अमरावतीला जाऊन मतदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करेन,” असेही देशमुख म्हणाले.

    ते पुढे म्हणाले की, “मी डिजिटल माध्यमांद्वारे मतदारांच्या संपर्कात आहे. निवडणुकीचा निकाल काय लागेल हे १८ तारखेनंतरच स्पष्ट होईल. माझा फोन सुरू आहे आणि ज्यांचे फोन आले त्यांना मी उत्तर दिले आहे. माझ्याशी संपर्क होत नसल्याच्या बातम्या खोट्या आहेत. मी नॉट रीचेबल नाही, मला ज्यांचे ज्यांचे फोन आले मी त्यांना उत्तरे दिली आहेत.”

    दरम्यान, देशमुख यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी धामणगावचे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी रुग्णालयात भेट दिली. तसेच काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशीही त्यांचा संपर्क झाल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच देशमुख यांच्या काही महत्त्वाच्या वैद्यकीय तपासण्या होणार असून त्यांचे अहवाल आल्यानंतर प्रकृतीबाबत अधिक स्पष्ट चित्र समोर येणार आहे.

    अमरावती विधान परिषद निवडणूक यंदा अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात असून महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. अशा परिस्थितीत काँग्रेस उमेदवाराच्या प्रकृतीची चर्चा आणि त्यांच्या नॉट रीचेबल होण्याच्या अफवांमुळे काही काळ राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. आता मात्र देशमुख उपचार घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा

    राज्यातील सर्व आस्थापनांची पॉश अधिनियमानुसार तपासणी करण्याचे महिला व बाल विकास आयुक्तांचे निर्देश – महासंवाद
    राज्यातील आरोग्य यंत्रणेच्या बळकटीसाठी मंत्री प्रकाश आबिटकर यांची नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक – महासंवाद
    विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष प्रयत्न – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed