Thane Ghodbunder Road : घोडबंदर रोडवरील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी अवजड वाहतुकीला सकाळी बंदी घातली होती. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी २४ तासांत ही बंदी उठवली. एका बालकाचा मुंबई-अहमदाबाद महामार्गावर कोंडी होऊन मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर मनसेने या घटनेचा निषेध करत ठाणे आणि विरारमध्ये आंदोलन केलं.
दिवसा अवजड वाहतुकीला बंदी घातल्यामुळे मुंबई अहमदाबाद महामार्गावर वाहतूककोंडी होऊन एका लहानग्याचा रुग्णवाहिकेमध्ये मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर, ही अधिसूचना बदलण्याची वेळ आली आहे.
Thane News : घोडबंदर रोडवरील ट्रॅफिकवर उतारा, एकनाथ शिंदेंचे निर्देश; तात्काळ मोठा निर्णय, रात्री १२ ते ६ पर्यंत….
ठाणे शहरामध्ये अवजड वाहनांमुळे मोठी वाहतूककोंडी होत असून घोडबंदर भागातील रहिवाशांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. गृहसंकुलांमध्ये जाण्यासाठी मनस्तापाचा सामना करावा लागत आहे. याविरोधात घोडबंदर पट्ट्यातील गृहसंकुलांनी रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले होते. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे, पालघर आणि नवी मुंबई पोलिस अधिकारी, प्रशासकीय अधिकारी यांची बैठक घेऊन त्यामध्ये अवजड वाहतुकीवर नियंत्रणाच्या सूचना दिल्या होत्या.
ठाणे-बेलापूरची वाहतूक कोंडी फुटणार, दीड तासांचा प्रवास अवघ्या अर्ध्या तासांवर येणार; कसा असेल मार्ग?
गेल्या आठवड्यामध्ये झालेल्या या बैठकीनंतर ठाणे वाहतूक पोलिसांनी शहरातून अवजड वाहतूक सकाळी ६ ते रात्री ११ पर्यंत बंद ठेवण्याची अधिसूचना जाहीर केली होती. पालघर जिल्ह्यातून मुंबई-अहमदाबाद मार्गावर होणारी वाहतुक रोखल्यामुळे या भागात प्रचंड वाहतूककोंडी झाली होती. या कोंडीमध्ये अडकल्यामुळे एका रुग्णवाहिकेतील मुलाचा मृत्यू झाल्यानंतर वसई-विरार आणि पालघर परिसरातून संतापाची लाट उसळली होती. या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी अवघ्या काही तासांमध्ये नवी अधिसूचना जाहीर करून सकाळी ११ ते ५ या वेळेत अवजड वाहतुकीला प्रवेश देण्याची घोषणा केली. त्यामुळे आता रात्री आणि दुपारच्या वेळेत ठाण्याच्या घोडबंदर रोडवरील अवजड वाहतुक सुरू राहणार आहे.
उपमुख्यमंत्री शिंदे यांचा दौरा रद्द
वाहतूककोंडीबाबत शनिवारी सकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता. मात्र हा पाहणी दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती पालघर जिल्हा माहिती अधिकाऱ्यांमार्फत देण्यात आली.
Thane MNS Morcha: ठाण्यातील वाहतूक कोंडीविरोधात मनसेचे आवाहन, अविनाश जाधवांचं शिंदेंना आव्हान
मनसेतर्फे ठाणे, विरार येथे आंदोलन
अहमदाबाद महामार्गावरील समस्यांविरोधात मनसेने शनिवारी दुपारी विरार खानिवडे टोल नाका येथे ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. या १६ महिन्यांच्या बालकाचा मृत्यूला जबाबदार कोण, असा सवाल मनसेचे शहर प्रमुख प्रवीण भोईर यांनी केला. कंत्राटदार व संबंधित अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी मनसेने केली आहे. ठाणे येथेही कोडीच्या निषेधार्थ मनसेने शनिवारी ठाणे महापालिका ते हरिनिवास सर्कल दरम्यान आंदोलन केले.

