भाजपने आज मुंबई महापालिकेच्या निवडणुकांसाठी रणशिंग फुंकलं आहे. आमदार आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघामध्ये विजय मेळाव्याचं आयोजन केलं होतं.वरळी डोममध्ये हा मेळावा पार पडला.यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी कोरोना काळातला भ्रष्टाचार काढत ठाकरेंवर टीका केली आहे. हे ‘कफनचोर’ आम्हाला काय सांगणार असं म्हणत बोचरी टीका केली आहे.
कोरोना काळात हजारो रुपये लाटले, मुंबईकरांच्या टाळूवरचं लोणी खाल्लं; फडणवीसांनी ठाकरेंना घेरलं!
