मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी बीडमधील अतिवृष्टी झालेल्या भागात पाहणी केली. मनोज जरांगेंकडून महाकाळासह धामणगाव शिवारात नुकसानग्रस्त पिकांची पाहणी ते म्हणाले, शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्या, अन्यथा रस्त्यावर उतरू. शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी म्हणून मुख्यमंत्र्यांसह नेत्यांना बोलणारयावेळी शेतकरी खचला असून सरकारने शेतकऱ्यांना धीर द्यावा.मी शेतकऱ्यांचे लेकरू म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा आहे…असे आश्वासन यावेळी जरांगे पाटलांनी शेतकऱ्यांना दिले.