मुंबईत वर्सोवा-वांद्रे सागरी सेतू अर्थात सी-लिंकच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे. मच्छिमारांच्या मागणीनुसार या सी-लिंकमध्ये काही बदल करण्यात येणार आहेत. जुहू आणि वर्सोवा येथे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हे बदल आवश्यक ठरणार आहे.
पश्चिम द्रुतगती मार्गावरील ताण कमी करण्यासाठी तसेच दक्षिण मुंबईतून उत्तर मुंबईच्या दिशेने जलद पोहोचण्यासाठी एमएसआरडीसीने या सागरी सेतूचे बांधकाम सुरू केले आहे. सध्या प्रामुख्याने समुद्रात खांब उभारणीचे काम सुरू आहे. सेतूच्या सध्याच्या मूळ रचनेनुसार जुहू व वर्सोवा या जोडणीच्या ठिकाणी वाहतूककोंडीची शक्यता असल्याने त्यात बदल तसेच वाढ करण्याची मागणी स्थानिक मच्छिमारांनी केली होती. त्याचवेळी केंद्रीय पर्यावरण व वने मंत्रालयाच्या चमूने अलिकडे केलेल्या सेतूच्या प्रत्यक्ष पाहणीतही या सेतूशी जोडणाऱ्या सर्व जंक्शनवर वाहतूककोंडीची शक्यता लक्षात घेऊन मार्ग बदल सुचविले आहेत. त्याचवेळी सेतूच्या जुहू व वर्सोवा कनेक्टरला पश्चिम द्रुतगती मार्गाची जोड देण्याची गरजही समोर आली आहे. यासाठीच महत्त्वाचे बदल या सेतूसंदर्भात केले जाणार आहेत. त्यातूनच ही खर्चवाढ होत आहे.
पुणे-नाशिक महामार्ग एलिव्हेटेड होणार, दोन तासांचा प्रवास अवघ्या २० मिनिटांवर; कुठून, कसा असणार मार्ग?
या संदर्भात एमएसआरडीसीने महाराष्ट्र किनारपट्टी क्षेत्र नियमन प्राधिकरणाकडे (एमसीझेडएमए) अर्ज केला होता. त्यानुसार या सेतूतील पुलांचे दोन भाग हलविण्यात येणार असून एका भागाची लांबी १०० वरून ११० मीटर होणार आहे. जुहू कनेक्टरची लांबी ३.५४ किमीवरून ४.४५ किमी होणार असून यामुळे पुलासाठी १२० मीटर लांबीचे दोन अतिरिक्त भाग जोडावे लागणार आहेत. त्याचवेळी जुहू कनेक्टरवर समुद्राकडे जाणारे पाणी अडू नये यासाठी खांबांऐवजी केबलआधारित पूल उभारणी होणार आहे.
शिळफाटा-कल्याण ते रांजनोली वाहतूककोंडी सुटणार; 21 किमीचा उड्डाणपूल, दीड तासाचं अंतर 25 मिनिटांत पार होणार
वर्सोवा कनेक्टरची लांबी २.७२ किमीवरून ४.२९ किमी होणार आहे. या कनेक्टरवर पश्चिम द्रुतगती मार्गाने जाणाऱ्या रस्त्यावर अतिरिक्त केबलआधारित पुल उभा करावा लागणार आहे. याशिवाय सर्व चार पथकर नाक्यांच्या रचनेतही बदल केला जाणार आहे. यातूनच खर्चवाढ होत असल्याचे एमसीझेडएमएकडे एमएसआरडीसीने केलेल्या अर्जात व त्यासंबंधी अलिकडेच झालेल्या सुनावणीत समोर आले आहे.
कोकण-पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा पर्यायी वळण मार्गावरील पूल वाहून गेला, भयानक दृष्य!
सेतूच्या बदलांसंबंधी एमएसआरडीसीच्या या अर्जाला एमसीझेडएमएने मंजूरी दिली आहे. त्यानंतर यासंबंधी पुढील मंजुरीसाठी या प्रकल्पाची राज्य पर्यावरण प्रभाव मूल्यांकन प्राधिकरणाकडे शिफारस केली आहे.

