Mumbai Weather Update : मुंबई शहर-उपनगरासह परिसरातील ठाणे, कल्याण डोंबिवली, अंबनाथ, बदलापूर, वाशी, पनवेल, वसई विरार, पालघर या भागातही पावसाचा जोर आहे
शुक्रवारी रात्री राज्यभरात कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव सुरु असतानाच पाऊस सुरु झाला. मुंबई शहर-उपनगरासह परिसरातील ठाणे, कल्याण डोंबिवली, अंबनाथ, बदलापूर, वाशी, पनवेल, वसई विरार, पालघर या भागातही पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. यामुळे मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल ट्रेन मंदावली आहे. तर रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचून रस्ते जलमय झाले आहेत.
गरज असेल तरच घराबाहेर पडा
आवश्यकता नसल्यास शक्यतो घराबाहेर पडणे टाळा, कुठलीही आवश्यकता भासली, तर मदत आणि अधिकृत माहितीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षाच्या 1916 या संपर्क क्रमांकावर संपर्क साधा, महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
विक्रोळीत दरड कोसळली
मुंबई पूर्व उपनगरात विक्रोळी पार्कसाईट येथील वर्षानगरमध्ये भूस्खलन झाले आहे. मध्यरात्री 2.39 वाजता डोंगराळ भागातून माती आणि दगड घसरून एका झोपडीवर पडले. या दुर्घटनेत मिश्रा कुटुंबातील बापलेकीचा मृत्यू झाला, तर मायलेक जखमी झाले आहेत. उपचारादरम्यान 19 वर्षीय शालू मिश्रा आणि तिचे 50 वर्षीय वडील सुरेश मिश्रा यांचा मृत्यू झाला, तर 45 वर्षीय आरती आणि 20 वर्षीय ऋतुराज यांना ट्रॉमा वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे.
Bhayandar News : दोन वर्षांपूर्वी अंगावर वर्दी, भाईंदरमध्ये 24 वर्षीय पोलिसाने आयुष्य संपवलं, ऋतिकच्या मृत्यूने आईचा आक्रोश
कोकणात धुमशान
दुसरीकडे, कोकणात रायगड जिल्ह्यात पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली असून जिल्हा प्रशासनाने सावधगिरीचा इशारा दिला आहे, तर रत्नागिरीत खेडमध्ये जगबुडी नदीने इशारा पातळी गाठली असून, नगरपरिषद प्रशासन अलर्ट मोडवर आहे.
मुंबई-गोवा महामार्गाची शिवेंद्रराजे भोसलेंकडून पाहणी, काय-काय अडचणी; खड्डेदुरुस्ती कधी?
Mumbai Crime : गोरेगावमध्ये प्रख्यात बिल्डरच्या मुलीने आयुष्य संपवलं, लंडनला जाण्याआधी टोकाचं पाऊल, ओबेरॉय संकुलात 6 महिन्यात चौघांनी दिलेत जीव
मराठवाड्यात काय स्थिती?
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गेल्या 24 तासांपासून मुसळधार पाऊस बरसत आहे. कन्नड तालुक्यातील सर्वात मोठे असलेले शिवना टाकळी धरण 93.49 टक्के भरले आहे. त्यामुळे धरणाचे तीन दरवाजे 20 इंचानी उघडण्यात आले आहेत. तीन दरवाजांतून 2280 क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे शिवना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

