Jitendra Awhad: उत्तर कोरियासारखी हुकूमशाही भारतात दिसली तर आश्चर्य वाटायला नको, अशी टीका आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली.
कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाने १५ ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनी चिकन-मटन विक्रीवर बंदी घालून, महापालिका आयुक्त अभिनव गोयल या आदेशावर ठाम राहिल्याने विरोधकांनी आंदोलन केले. यावेळी आव्हाड पत्रकारांशी बोलत होते. या निर्णयाविरोधात खाटिक समाज, काँग्रेसच्या वतीनेही कोंबड्या हवेत उडवून आंदोलन करण्यात आले.
मुंबईकरांनो, कृपया लक्ष द्या! पश्चिम रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक, कोणत्या लोकल रद्द? पाहा Timetable
स्वातंत्र्य दिन हा राष्ट्रीय सण असल्याने १९८८ सालापासून या दिवशी कत्तलखाने आणि मांसविक्री केंद्र बंद ठेवली जातात. यंदाही या आदेशाची अंमलबजावणी करताना प्रशासनाने खाटिक संघटनेला मांसविक्री दुकाने बंद ठेवण्याच्या नोटिसा दिल्या होत्या. यानंतर राज्यभरात या निर्णयाचे प्रतिसाद उमटले. शिवसेना (उबाठा) पक्ष, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी (शप) आरपीआयसह खाटिक संघटनानी या निर्णयाला विरोध करत आयुक्तांना हा निर्णय मागे घेण्यासाठी निवेदने दिली होती. मात्र हा आपण घेतलेला निर्णय नसून वर्षानुवर्षे या आदेशाची अमलबजावणी केली जात असल्याचे सांगत आयुक्तांनी माघार घेण्यास नकार दिला. यामुळे शुक्रवारी आंदोलन होण्याची शक्यता होती. त्यानुसार सकाळीच पालिका मुख्यालयाकडे येणारा रस्ता दोन्ही बाजूंनी वाहतुकीसाठी बंद करत मुख्यालयाला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.
Thane Dahi Handi 2025: हंडीत कोट्यवधींचे ‘लोणी’; ठाण्यात आज रंगणार दहीहंडी उत्सवाचा थरार
महापालिकेचे सुरक्षा कर्मचारी आणि पोलिसांनी मुख्यालयाभोवती कडे केले होते. तरीही सकाळी ११च्या सुमारास खाटिक समाजाच्या वतीने मुख्यालयासमोर महापालिकेच्या निषेधार्थ घोषणा देत कोंबड्या उडवत आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी तातडीने आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. तर काही वेळातच काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते दाखल झाले. त्यांनीही मुख्यालयात कोंबड्या उडवण्याचा प्रयत्न करताच पोलिसांनी त्यांचीही धरपकड केली.
Dahi Handi 2025: ‘गोविंदां’वर मुंबई पोलिसांची करडी नजर; नियम मोडणाऱ्यांवर होणार कायदेशीर कारवाई
दरम्यान, दुपारी २च्या सुमारास आव्हाड यांनी मुख्यालयालगतच्या हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेत प्रशासनाचा निषेध केला. महापालिका क्षेत्रात इतके प्रश्न असताना मांसाहार विरुद्ध शाकाहार , किंवा मराठी विरुद्ध अमराठी यांसारखे विषय राजकारण आणि निवडणुकीसाठी पुढे आणले जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

