• Sun. Mar 8th, 2026
    खामगाव MIDCमधील सुपरवायझरला निर्घृणपणे संपवलं; हातपाय बांधून विहिरीत फेकले, घटनेनं खळबळ

    Buldhana Crime: घनश्याम हे ‘मुलाच्या अॅडमिशनच्या चौकशीसाठी एका शिक्षकाला भेटायला जातोय’, असं सांगून घरातून गेले होते. पण घरी परतली डेडबॉडी, प्रकरणाने एकच खळबळ उडाली आहे.

    buldhana supervisor death (फोटो– महाराष्ट्र टाइम्स)

    म. टा. वृत्तसेवा, बुलढाणा: खामगाव एमआयडीसीमधील हरेकृष्ण इंडस्ट्रीजमध्ये कार्यरत सुपरवायझरची हातपाय बांधून विहिरीत फेकून हत्या करण्यात आली. ही घटना मलकापूर तालुक्यातील धानोरा शिवारात मंगळवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. चार दिवसांपूर्वी पर्यवेक्षक बेपत्ता झाला होता.

    नेमकं काय घडलं?
    घनश्याम रमेश भुतडा (४८) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. खामगाव एमआयडीसीत हरेकृष्ण इंडस्ट्रीजमध्ये भुतडा सुपरवायझर म्हणून काम करीत होते. मलकापूर तालुक्यातील धानोरा शिवारात संजय पाटील यांच्या राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या शेतातील विहिरीत भुतडांचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी पंचनामा करून त्यांचा मृतदेह बाहेर काढला. यावेळी त्यांचे हातपाय बांधलेल्या अवस्थेत आढळले. यावरून त्यांची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले. अज्ञात आरोपींनी खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांना विहिरीत फेकले.
    Ajit Pawar: जाहीर ठिकाणी बोलताना तारतम्य बाळगा; अजित पवार यांनी टोचले कार्यकर्त्यांचे कान
    याप्रकरणी नातेवाइक रवींद्र सुभाष भुतडा (रा. वरूड , ता. मोताळा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मलकापूर ग्रामीण पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदविला.

    बेपत्ताची तक्रार
    घनश्याम भुतडा यांच्या मुलाची शेगाव येथील एका कॉलेजमध्ये प्रवेशाकरिता निवड झाली आहे . प्रवेशाच्या चौकशीसाठी सुटाळा येथील एका शिक्षकाकडे जातो म्हणून ते २ ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजतापासून घराबाहेर पडले होते . तेव्हापासून ते बेपत्ता झाल्याची तक्रार कुटुंबीयांनी पोलिसांत दिली होती. त्यांचा शोध घेत असतानाच मलकापूर तालुक्यात मृतदेह आढळला.
    चार तासांचा प्रवास फक्त सव्वा तासांत; समृद्धी महामार्ग-वाढवण बंदराला जोडणाऱ्या रस्त्याला मंजुरी
    यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या
    सततची नापिकी आणि वन्यप्राण्यांच्या नुकसानीमुळे घाटंजी तालुक्यातील भांबोरा येथील शेतकऱ्याने मंगळवारी आत्महत्या केली. सागर लक्ष्मण पुसनाके (३०) , असे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्याकडे वडिलोपार्जित १.६२ हेक्टर शेती होती . नापिकीमुळे त्यांची आर्थिक अडचण वाढली होती. ही समस्या असतानाच वन्यप्राण्यांकडून नुकसान वाढल्याने ते त्रस्त होते. सोमवारी रात्री शेतावर गेले असताना त्यांनी किटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली . शेतात सकाळी त्यांना मृतदेह आढळला. घाटंजी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविला

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा