• Fri. Mar 6th, 2026
    7 हजारांसाठी उपनिरीक्षकाला बेड्या पडल्या, कोर्टाने सुनावली कठोर शिक्षा

    Police Sub Inspector Bribery Case : केवळ सात हजारांसाठी आपल्या खात्याला आणि पदाला काळीमा फासणाऱ्या एका पोलिस उपनिरीक्षकाला अखेर शिक्षा सुनावण्यात आली. काय होते हे प्रकरण पाहूयात

    (फोटो– Lipi)

    सुधीर पाटील, सातारा : पोलीस ठाण्यात दिलेल्या तकारी अर्जाचा अहवाल वरीष्ठांना पाठविण्यासाठी ७ हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी दोषी ठरवून सेवानिवृत्त उपनिरीक्षकाला कराडच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन वर्षे सक्तमजुरी आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. भरत गोपाळ होळकर, असं शिक्षा झालेल्या आरोपीचं नाव आहे.

    प्रकरण काय?

    पाटण तालुक्यातील एकाने कराड शहर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. त्याचा अहवाल वरिष्ठांना पाठविण्यासाठी तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक भरत गोपाळ होळकर यांनी तक्रारदाराकडे ७ हजार रुपये लाच मागितल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.
    Crime News: तू खूप क्यूट आहेस, घरी सांग उशिरा येते, फिरायला जाऊ; चौथीतील मुलीला स्कूल बसमध्ये अश्लील स्पर्श, 30 वर्षीय चालकावर गुन्हा
    तक्रार अर्जाचा अहवाल वरीष्ठांना पाठविण्यासाठी तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक भरत होळकर याला २० जुलै २०१४ रोजी कराड शहरातील पंचायत समितीच्या बाजूस असलेल्या दर्शनी रेस्टॉरंटसमोर सरकारी पंचांसमक्ष ७ हजार रूपयांची लाच घेताना सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले होते. याप्रकरणी एसीबीच्या तत्कालीन पोलीस निरीक्षक वैशाली पाटील यांनी तपास करून दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले होते.
    Thane Crime : निळ्या टीशर्टवाल्याने माझ्याशी… ठाण्याच्या नामांकित शाळेत 4 वर्षीय मुलीसोबत गैरकृत्य, CCTV मध्ये मात्र…
    या खटल्याची मंगळवारी (५ ऑगस्ट) कराडच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात अंतिम सुनावणी झाली. या खटल्यात सहाय्यक जिल्हा सरकारी वकील एम. व्ही. कुलकर्णी व आर. डी. परमाज यांनी सरकार पक्षातर्फे एकूण ४ साक्षीदार तपासले. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, पंच, तपासी अंमलदार यांची साक्ष ग्राह्य धरून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. बी. पतंगे यांनी आरोपीस दोन वर्षे सक्तमजुरी आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सरकार पक्षाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस हवालदार रमेश वीरकर यांनी सहकार्य केले.

    मराठी तरुणीसोबत गंभीर प्रकार; पोलिसांनी आरोपीला कल्याण न्यायालयात हजर केलं

    ज्यांच्या खांद्यांवर समाजाच्या रक्षणाची आणि कायदा व्यवस्थेची जबाबदारी असते, त्याच पोलिसांकडून केवळ 7 हजारांसाठी इमान विकला गेला. या कृत्यामुळे पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले. एका भ्रष्ट पोलिसामुळे इतर इमानदार पोलिस अधिकाऱ्यांवर, कर्मचाऱ्यांवर, त्यांच्या प्रामाणिकपणावर संशय निर्माण होतो. तेव्हा जर कुंपणच शेत खात असेल तर सामान्य नागरिकांनी काय करावे? असा सवाल सुजाण नागरिक करत आहेत.

    आशिष मोरे

    लेखकाबद्दलआशिष मोरेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन कन्सलटंट म्हणून कार्यरत. राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि मानसशास्त्र बातम्यांमध्ये आवड. सायकॉलॉजी मध्ये विशेष अध्ययन.… आणखी वाचा