Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. नवीन मोबाईल घेऊन न दिल्याने अकरावीच्या मुलाने आत्महत्या केली.
आई-वडील विभक्त रहात होते
अथर्व गोपाल तायडे (वय १६, वडगाव) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. या प्रकरणी अधिक माहिती अशी की, तायडे कुटुंबीय हे मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथील रहिवासी आहे. गोपाल तायडे व पत्नी शितल तायडे यांच्यात वाद झाल्याने हे विभक्त राहतात. अथर्व हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता. तो सध्या शरणपूर येथील दिल्ली पब्लिक स्कूल येथे अकरावीच्या वर्गात शिकतो.
अथर्वने आईकडे नवीन मोबाईल घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. आईने मोबाईल घेऊन देण्यास नकार दिल्याने रागाच्या भरात अथर्व खवड्या डोंगराकडे धावत सुटला. आईने त्याचा पाठलाग केला मात्र तोपर्यंत त्याने खवड्या डोंगरावरून उडी मारून आत्महत्या केली होती. पोटच्या गोळ्याने डोळ्यादेखत जीव गमावल्याने अथर्वच्या आईने घटनास्थळी टाहो फोडला.
घटनेमुळे गावात हळहळ
अकरावीत शिकणाऱ्या अथर्वने मोबाईल न दिल्याच्या कारणावरून आईसमोर डोंगरावरून उडी मारून आत्महत्या केली. ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात आले आहे.
असा राग काय कामाचा? क्लासमध्ये किरकोळ वाद अन् दहावीतील विद्यार्थ्याचा गेला जीव, दोन मित्र ताब्यात
मोबाइलवर व्हिडीओ बनवून आत्महत्या
दुसरीकडे, उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज येथे राहणाऱ्या अमर मुळेने आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. त्याने वांगी गायरान झुडपामध्ये आत्महत्या करत आपली जीवनयात्रा संपवली. आत्महत्या करण्यापूर्वी आत्याच्या मुलाच्या मोबाइलवर व्हिडीओ व आत्महत्या करत असल्याच्या ठिकाणाचे लोकेशन पाठवले. अमरच्या आत्महत्येने नान्नज परिसरात खळबळ उडाली आहे. . विशेष म्हणजे अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच त्याचा विवाह झाला हता या व्हिडिओमध्ये तरुणाने पाच जणांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं सांगितलं.

