• Sat. Mar 7th, 2026
    रेल्वे रुळांवर बॉडी सापडली, शवविच्छेदनही झालं, अंत्यसंस्काराची तयारी सुरु, तेवढ्यात…

    Missing Man Found : कल्पना करा की, जवळची व्यक्ती कायमची सोडून गेल्याची बातमी कळली. दुःखाचा डोंगर कोसळलाय आणि त्या व्यक्तीच्या अंतयात्रेचीही तयारी झाली आहे. स्मशानभूमित मृतदेह नेणार इतक्यात ती व्यक्ती दारात हजर. काय? वाटतेय ना एखाद्या मालिकेची स्टोरी? पण हे वास्तवात घडलंय.

    (फोटो– Lipi)

    निलेश पाटील, जळगाव : माणसाला सगळ्यात जास्त भीती वाटते ती मरणाची. आपल्या जवळची व्यक्ती आपल्याला सोडून कधीच जाऊ नये. तीचा मृत्यू होऊ नये असं प्रत्येकालाच वाटत असतं. परंतु, निसर्गाचा समतोल राखण्यासाठी जन्म-मृत्यूचं चक्र निसर्गातःच निरंतर सुरु आहे. पण कल्पना करा की, जवळची व्यक्ती कायमची सोडून गेल्याची बातमी तुम्हाला कळली. दुःखाचा डोंगर कोसळलाय आणि त्या व्यक्तीच्या अंतयात्रेचीही तयारी झाली आहे. स्मशानभूमित मृतदेह नेणार इतक्यात ती व्यक्ती दारात हजर. काय? वाटतेय ना एखाद्या मालिकेची स्टोरी? पण हे वास्तवात घडलंय.

    ‘मृत’ झालेले खैरनार स्वतः घरी परतले

    जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील पाळधी गावात एक विचित्र घटना घडली. चार दिवसांपासून बेपत्ता असलेले ६५ वर्षीय रघुनाथ वामन खैरनार जिवंत असताना, नातेवाईकांनी दुसऱ्याच व्यक्तीचा मृतदेह त्यांचा समजून अंत्यसंस्काराची तयारी केली. पण सायंकाळी ‘मृत’ झालेले खैरनार स्वतः घरी परतले आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.
    Mumbai Crime : समलिंगी व्हिडिओवरुन ब्लॅकमेल, मुंबईत 32 वर्षीय सीएने आयुष्य संपवलं, शेवटच्या चिठ्ठीत म्हणतो, आई पुढच्या जन्मी…

    शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन झाले

    पाळधी गावाजवळ रेल्वे रुळावर एक मृतदेह सापडला होता. तो छिन्नविछिन्न अवस्थेत असल्याने ओळखणे कठीण होते. पण नातेवाईकांनी चेहऱ्याचा काही भाग आणि अंगावरील खुणांवरून तो रघुनाथ खैरनार यांचाच असल्याचा समज केला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवला. तिथे शवविच्छेदनही झाले.
    संध्याकाळी अंत्यसंस्काराची तयारी सुरू असताना, “बाबा घरी परतले आहेत!” असे नातेवाईकांना समजले. कुणीतरी साईबाबा मंदिराकडून चालत येताना दिसले आणि ते रघुनाथ खैरनारच होते. त्यामुळे एकीकडे दु:ख आणि दुसरीकडे आनंद, असे विचित्र वातावरण निर्माण झाले. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे. ओळख पटवताना जास्त काळजी घेणे किती महत्त्वाचे आहे, हे यातून दिसून येते. अजूनपर्यंत रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही.

    कुटुंबीयांचा गैरसमज झाला

    खैरनार यांच्या कुटुंबीयांचा गैरसमज होण्यामागे एक कारण होते. रेल्वे स्टेशनवर सापडलेल्या मृतदेहाची देहयष्टी आणि चेहरा रघुनाथ खैरनार यांच्यासारखाच होता. तसेच, अंगावरचे कपडे, पायातील चप्पल आणि अंगावर गोंदलेले चिन्हसुद्धा सारखेच होते. त्यातच रघुनाथ खैरनार यांची मानसिक स्थिती ठीक नसल्यामुळे ते अनेकदा घरातून निघून जातात. त्यामुळे कुटुंबीयांचा गैरसमज झाला. पण रघुनाथ खैरनार सुखरूप परतल्याने कुटुंबाला खूप आनंद झाला.

    आशिष मोरे

    लेखकाबद्दलआशिष मोरेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि मानसशास्त्र बातम्यांमध्ये आवड. सायकॉलॉजी मध्ये विशेष अध्ययन.… आणखी वाचा