Devendra Fadnavis on Mira Bhayandar MNS Morcha : मिरा-भाईंदरमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी अमराठी व्यापाऱ्यांच्या मोर्चाला उत्तर देण्यासाठी ओम शांती चौकात आंदोलन सुरू केले. पोलिसांनी परवानगी नाकारल्याने आणि अनेक नेत्यांना अटक केल्याने तणाव निर्माण झाला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
कोणीही मोर्चाला परवानगी मागितली की आपण देतो. या मी पोलिस आयुक्तांना विचारलं की परवानगी का दिली नाही? यावर त्यांनी सांगितलं की, मोर्चाच्या मार्गासंदर्भात चर्चा सुरू होती पण ते जाणीवपूर्वक अशा प्रकारचा मार्ग होते ती तिथे संघर्ष होईल आणि पोलिसांचं म्हणणं असं होतं की, काही लोकांच्या संदर्भात त्यांच्याकडे इनपूट आले होते की त्यांना वेगळ्या प्रकारची कारवाई करायची आहे. पोलिसांनी इतकंच सांगितलं की नेहमीचा जो मार्ग आहे तो घ्या. पण त्यांनी नकार दिला आणि आम्ही हाच मार्ग घेणार असं म्हटल्यामुळे पोलिसांनी नाकारल्याचं मला सीपींनी सांगितल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.
MNS Mira Bhayandar Morcha : मिरा भाईंदरमध्ये मोठा राडा, मनसेच्या कार्यकर्त्यांची धरपकड, महिलांना रिक्षात डांबून नेलं
जर मनसेचं काय कोणालाही मोर्चा काढायला परवानगी मिळेल पण आम्हाला इथेच काढायचा आहे, अशाच प्रकारचा काढायचा आहे अशा प्रकारे कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न झाला तर ते योग्य नाहीये. शेवटी आपल्याला एकाच राज्यात एकत्रिपतणे राहायचं आहे, राज्याच्या विकासाचा विचार करायचा आहे. योग्य मार्ग घेऊन परवानगी मागितली तर ती कधीही मिळेल. आजही मिळेल आणि उद्याही मिळेल, असं फडणवीसांनी म्हटलं आहे.
MNS Avinash Jadhav Arrest : मिरा भाईंदरमधील मराठी भाषिकांच्या मोर्चाला परवानगी नाकारली, अविनाश जाधव मध्यरात्री ताब्यात
सीपींनी मला सांगितलं आहे, जो मार्ग दिला त्यावर अमराठी व्यापाऱ्यांचा मोर्चा निघाला. त्यांनी कोणत्याही मार्गाचा आग्रह केला नाही. मात्र यांनी स्पेसिफिक अशा मार्गाचा आग्रह केला जिथे मोर्चा काढणं कठीण आहे. त्यांनी सभा घ्यायची मागणी केली त्यालाही आम्ही मान्यता दिली. मात्र त्याच ठिकाणी मोर्चा काढायचा होता, ज्यातून काही अडचणी निर्माण झाल्या असत्या त्यासोबतच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता. इतके वर्षे आपण मोर्चे काढत असतो. आता मागे ५ तारखेला दोन संघटनांनी मोर्चा काढायचं ठरवलं होतं. चर्चा होऊन तेव्हा मार्ग ठरला होता. पण एखाद्या मोर्चाने जर गडबड होणार असेल किंवा पोलिसांना कंट्रोल राखणं अवघड जात असेल. मिरा भाईंदरच्या स्टेशनवर तो मोर्चा गेला असता तर तु्म्हालाही मीहित आहे तिथे कशी परिस्थिती असते. पोलिसांनी सातत्याने मार्ग बदलायला लावला पण त्यांनी बदलला नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

